शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

रिपब्लिकन ऐक्यासाठी दोन पावले मागे; प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व करावे: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 16:59 IST

मी मंत्रिपदाच्या मागे नाही, ज्यांच्यासोबत जातो त्यांची सत्ता येते

लातूर : राज्यात आता कोणत्याही एका पक्षाचे सरकार येणार नाही. आघाडी करूनच सत्ता मिळवावी लागणार आहे. या सत्तेमध्ये आंबेडकरी पक्ष समुहांनी मागे राहू नये. राजकीय पक्षांसोबत हातमिळवणी करून सत्तेत गेले पाहिजे.  आंबेडकरी पक्षांचे ऐक्य हवे. प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar ) ऐक्याचे नेतृत्व करावे. त्यासाठी मी दोन पावले मागे यायला तयार आहे, असे मत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी येथे बुधवारी व्यक्त केले. 

रामदास आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट निर्माण झालेले आहेत. यामुळे सत्ता मिळू शकणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीलाही सत्ता मिळू शकत नाही. त्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. रिपब्लिकन ऐक्य घडवावे लागेल. मात्र, प्रकाश आंबेडकर त्यासाठी तयार नाहीत. एकत्रित आंबेडकरी पक्षाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी करावे. मी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे. मंत्री पदाच्या अथवा सत्तेच्या मी मागे नाही. परंतु, मी ज्यांच्यासोबत जातो तो पक्ष सत्तेत येतो आणि मलाही मंत्रीपद मिळते, असेही ते म्हणाले. बसपा पक्ष बॅकफूटवर गेलेला आहे. त्यामुळे आता देशात बसपाची जागा रिपाइं घेत आहे. उत्तर प्रदेशमध्येही रिपाइंच राहणार आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भर होत आहे. तरुणांनी आत्मनिर्भर योजनेअंतर्गत वेगवेगळे रोजगार उभे करून स्वत:च्या पायावर उभे टाकले पाहिजे. पत्रपरिषदेला खा. सुधाकर शृंगारे, चंद्रकांत चिकटे यांची उपस्थिती होती. 

भोंगे उतरविण्याच्या राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध... आपल्या देशात लोकशाही आहे, याचे भान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठेवावे. मस्जिदीवरील भोंगे उतरविण्याची जी त्यांनी भूमिका घेतली आहे, त्याला आमचा विरोध आहे. तुम्हाला मंदिरात भोंगे लावायचे असेल तर लावा, मस्जिदीवरील भोंग्यांना तुमचा विरोध कशासाठी, असा सवालही आठवले यांनी केला. 

शरद पवार पुरोगामी नेते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका सभेमध्ये शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप केला. याबाबत आठवले म्हणाले, राज ठाकरे यांचा तोल गेलेला आहे. शरद पवार पुरोगामी नेते आहेत. ते जातीयवादी नाहीत. त्यांनी आपल्या राजकारणामध्ये नेहमीच धर्मनिरपेक्ष भूमिका मांडलेली आहे. त्यांना जातीयवादी म्हणणे चुकीचे आहे, असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरlaturलातूर