शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

अडीच महिने उलटले; शेतकऱ्यांना विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळेनात!

By हरी मोकाशे | Updated: September 13, 2023 19:35 IST

उन्हाळ्यात टंचाई निवारणासाठी १२८ गावांत अधिग्रहणे

लातूर : सध्या पावसाळ्याचे दिवस असले तरी पावसाने ताण दिल्याने धास्ती वाढली आहे. दरम्यान, गत उन्हाळ्यात रविराजाने रौद्ररूप धारण केल्याने जिल्ह्यातील १३९ गावांना पाणीटंचाईचे चटके जाणवत होते. ही टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून १२८ गावांमध्ये अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे ४१ लाख ३७ हजार रुपये पाणी बिल अडीच महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून चौकशी करण्यास सुरूवात झाली आहे.

गत उन्हाळा अधिक तीव्र होता. सूर्यनारायणाच्या वाढत्या उष्णेतमुळे जीवाची काहिली होत होती. दुपारी रस्तेही निर्मनुष्य होत होते. त्याचबरोबर बाष्पीभवनाचा वेग वाढला होता. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत होती. जिल्ह्यात असलेल्या ८ मध्यम प्रकल्पांतील जलसाठा खालावत होता. वाढत्या उन्हामुळे विहिरी, कुपनलिका काेरड्या पडू लागल्या होत्या. त्याचबरोबर काही ठिकाणच्या नळ योजनाही पाण्याअभावी बंद पडल्या होत्या. परिणामी, तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. त्यातच पाऊस लांबल्याने ताण वाढला होता. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. तीव्र उन्हामुळे जिल्ह्यातील १३९ गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवत होत्या. पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जून अखेरपर्यंत १२८ गावांना विहीर, बोअर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.

शेतकऱ्यांकडून वारंवार चौकशी...गत उन्हाळा अधिक कडक होता. त्यामुळे गावातील जलस्रोत आटू लागले होते. परिणामी गावात पाणीटंचाई जाणवत होती. अशा परिस्थितीत आम्ही उन्हाळी पिकांना पाणी देण्याऐवजी गावाला पाणी पुरवठा केला. अधिग्रहण बंद होऊन अडीच महिने उलटले तरी अद्यापही अधिग्रहणाचे बिल मिळालेले नाही. हे बिल मिळावे म्हणून सातत्याने पंचायत समितीकडे चौकशी करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव...जिल्ह्यात गत उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई होती. टंचाई निवारणासाठी १२८ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले. त्यासाठी ४१ लाख ३७ हजारांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना बिल अदा करण्यात येईल.- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे व पाणी पुरवठा.

अहमदपुरात पाणी समस्या सर्वाधिक...तालुका - अधिग्रहण - बिललातूर - ०५ - १८३६००औसा - ४४ - १०८६६००रेणापूर - ०६ - २५००००अहमदपूर - ५१ - १९९१४००चाकूर - ०९ - १७००००उदगीर - ०५ - १६५०००जळकोट - ०८ - २९०४००एकूण - १२८ - ४१३७०००

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर