शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील शाळांमध्ये किलबिलाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST

लातूर : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमध्ये गुरुवारपासून शाळा सुरू झाल्या असून, अनेक शाळांमध्ये चांगला प्रतिसाद ...

लातूर : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमध्ये गुरुवारपासून शाळा सुरू झाल्या असून, अनेक शाळांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी १०७ शाळा सुरू झाल्या असून, त्यात ६ हजार ५२ विद्यार्थी उपस्थित राहिले. अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र आणि पालकांची सहमती पत्र असलेल्या १०७ शाळा सुरू झाल्या. त्यामध्ये लातूर तालुक्यातील (कंसात विद्यार्थी उपस्थिती) ११ (७२७), उदगीर १६ (६६१), देवणी ११ (६५६), शिरूर अनंतपाळ ८ (४५९), निलंगा ११ (७१६), औसा १५ (१२७४), अहमदपूर १६ (५८०), जळकोट ६ (२३९), चाकूर ६ (४०६), रेणापूर ७ (३३४) अशा १०७ शाळांमध्ये ६ हजार ५२ विद्यार्थी उपस्थित होते. तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून १,३०५ जणांनी पहिल्या दिवशी कर्तव्य बजावले.

ना हरकत व संमतीपत्र घेणे सुरू

कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये शाळा सुरू करण्याचे निर्देश शासनाचे आहेत. त्यानुसार शाळा सुरू झाल्या आहेत. ज्या गावांमध्ये रुग्णसंख्या नाही, त्या ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन पालकांची संमती घेतली जात आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांकडून संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे काम अद्यापही सुरू आहे. कोरोना नियमांचे अनुपालन करून शाळेचा पहिला दिवस ग्रामीण भागात उत्साहात सुरु झाल्याचे शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी सांगितले.

शिक्षकांनी केले मुलांचे स्वागत

लातूर शहरालगत असलेल्या मळवटी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात ४५ टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. मुख्याध्यापक युवराज शिंदे यांनी विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. सॅनिटायझर, ऑक्सिमीटर तपासणी व थर्मल स्क्रिनिंग करून वर्गात प्रवेश देण्यात आला. यावेळी उमाकांत धोंडजी, सुहास माकणीकर, जाफरअली सय्यद, विलास गिरी, मंजुषा शिंदे, मधुकर गरड, रंगनाथ माळी, बिटाजी भोसले, सुनील आगलावे, आदींची उपस्थिती होती.