शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

मंगळवारपासून पूर्ण क्षमतेने ‘जलदूत’ जाणार

By admin | Updated: April 16, 2016 00:21 IST

मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा : युध्दपातळीवर काम; दिवसआड २७ लाख लिटर पाणी देणार

शरद जाधव -- सांगली --पाणीटंचाईने व्याकूळ झालेल्या लातूरकरांच्या मदतीला धावलेल्या सांगली-मिरजकरांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, आता लातूरला अधिक सुलभरित्या पाणी पोहोचविण्यासाठी यंत्रणा सरसावली आहे. स्वतंत्र जलवाहिनीद्वारे ‘जलदूत’ एक्स्प्रेसच्या वाघिणी भरून एकाचवेळी २७ लाख लिटर पाणी देण्याची क्षमता असलेली योजना दोन दिवसात पूर्ण होणार आहे. पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीची स्वच्छताही महापालिका प्रशासनाने सुरू केली असून, लातूरला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी एकावेळी चार यंत्रणा कामाला लागल्या आहेत. कृष्णा नदीपासून मिरजेच्या रेल्वे यार्डापर्यंतचे अंतर सात किलोमीटर आहे. त्यापैकी नदीपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत साडेचार किलोमीटरची जलवाहिनी अस्तित्वात आहे. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे जलशुद्धीकरण केंद्र ते रेल्वे यार्ड या उर्वरित २७०० मीटर अंतरात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात ३०० मीटर अंतरावर लोखंडी वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी १ कोटी ८५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम शुक्रवारपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना, १२ इंच व्यासाच्या पीव्हीसी पाईप जळगाववरून उपलब्ध न झाल्याने कामात अडथळा आला होता. मात्र, आता त्या उपलब्ध झाल्याने सोमवारी दुपारपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रात्रंदिवस यंत्रणा कार्यरतलातूरला पूर्ण क्षमतेने पाणी पोहोचविण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून, या कामावर पाच जेसीबी, वेल्डिंग कामगार आणि इतर असे शंभराहून अधिक कामगार रात्रंदिवस कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबर जीवन प्राधिकरण, रेल्वे व महसूल विभागाचे अधिकारी तळ ठोकून आहेत. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड हे दिवसातून दोनदा भेट देऊन स्वत: कामाची पाहणी करीत आहेत. एकाचवेळी २५ टँकर भरण्याची सोयपाणीपुरवठा अधिक सुलभ होण्यासाठी २५ अश्वशक्तीच्या दोन मोटारी बसविण्यात येणार आहेत. एकावेळी २५ टॅँकर भरण्याची सोय या नवीन यंत्रणेमुळे होणार असून ५० वाघिणींची गाडी पाठविण्याचे नियोजन प्रत्यक्षात साकार होणार आहे. या ऐतिहासिक प्रयोगाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. पाण्याच्या आणीबाणीचे गांभीर्य ओळखून यंत्रणा काम करत आहे. जलवाहिनीसाठी जळगाववरून मिरजेत सहा मीटर्सच्या ७२ पीव्हीसी पाईप आल्या आहेत. तीन ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगचे काम असल्याने विलंब लागत आहे.५० वाघिणींतून पाणी देण्याचा प्रयत्नमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जलशुद्धीकरण केंद्रात क्रॉस कनेक्शनच्या मुख्य जोडणीचे काम पूर्ण झाले. तसेच, कोल्हापूर रेल्वे रुळाखालून जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. एकाचवेळी २५ वाघिणींमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हैदरखान विहीर ते यार्डापर्यंत जलवाहिनीचे काम सुरू करण्यात आले असून हे संपूर्ण काम सोमवारपर्यंतपूर्ण होण्याची शक्यता आहे. लातूरला विक्रमी वेळेत पाणी पोहोचले असले तरी, ५० वाघिणींतून पाणी देण्यासाठी प्रयत्न आहे व तो येत्या दोन दिवसात पूर्णत्वास येणार आहे. लातूरला पाणी देण्यात सांगलीकरांनी दाखविलेले दातृत्व अभिमानास्पद आहे. केवळ पाच दिवसांच्या नियोजनातून लातूरला पाणी देण्यात यश आल्याने, आता पूर्ण क्षमतेने ५० वाघिणींच्या माध्यमातून पाणी देण्याचे नियोजन पूर्णत्वास येत आहे. सोमवारपर्यंत काम पूर्ण झाल्यास मंगळवारपासून लातूरला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात कोणतीही अडचण नाही. - मकरंद देशपांडे, योजनेचे प्रणेते