शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मंगळवारपासून पूर्ण क्षमतेने ‘जलदूत’ जाणार

By admin | Updated: April 16, 2016 00:21 IST

मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा : युध्दपातळीवर काम; दिवसआड २७ लाख लिटर पाणी देणार

शरद जाधव -- सांगली --पाणीटंचाईने व्याकूळ झालेल्या लातूरकरांच्या मदतीला धावलेल्या सांगली-मिरजकरांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, आता लातूरला अधिक सुलभरित्या पाणी पोहोचविण्यासाठी यंत्रणा सरसावली आहे. स्वतंत्र जलवाहिनीद्वारे ‘जलदूत’ एक्स्प्रेसच्या वाघिणी भरून एकाचवेळी २७ लाख लिटर पाणी देण्याची क्षमता असलेली योजना दोन दिवसात पूर्ण होणार आहे. पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीची स्वच्छताही महापालिका प्रशासनाने सुरू केली असून, लातूरला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी एकावेळी चार यंत्रणा कामाला लागल्या आहेत. कृष्णा नदीपासून मिरजेच्या रेल्वे यार्डापर्यंतचे अंतर सात किलोमीटर आहे. त्यापैकी नदीपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत साडेचार किलोमीटरची जलवाहिनी अस्तित्वात आहे. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे जलशुद्धीकरण केंद्र ते रेल्वे यार्ड या उर्वरित २७०० मीटर अंतरात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात ३०० मीटर अंतरावर लोखंडी वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी १ कोटी ८५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम शुक्रवारपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना, १२ इंच व्यासाच्या पीव्हीसी पाईप जळगाववरून उपलब्ध न झाल्याने कामात अडथळा आला होता. मात्र, आता त्या उपलब्ध झाल्याने सोमवारी दुपारपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रात्रंदिवस यंत्रणा कार्यरतलातूरला पूर्ण क्षमतेने पाणी पोहोचविण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून, या कामावर पाच जेसीबी, वेल्डिंग कामगार आणि इतर असे शंभराहून अधिक कामगार रात्रंदिवस कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबर जीवन प्राधिकरण, रेल्वे व महसूल विभागाचे अधिकारी तळ ठोकून आहेत. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड हे दिवसातून दोनदा भेट देऊन स्वत: कामाची पाहणी करीत आहेत. एकाचवेळी २५ टँकर भरण्याची सोयपाणीपुरवठा अधिक सुलभ होण्यासाठी २५ अश्वशक्तीच्या दोन मोटारी बसविण्यात येणार आहेत. एकावेळी २५ टॅँकर भरण्याची सोय या नवीन यंत्रणेमुळे होणार असून ५० वाघिणींची गाडी पाठविण्याचे नियोजन प्रत्यक्षात साकार होणार आहे. या ऐतिहासिक प्रयोगाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. पाण्याच्या आणीबाणीचे गांभीर्य ओळखून यंत्रणा काम करत आहे. जलवाहिनीसाठी जळगाववरून मिरजेत सहा मीटर्सच्या ७२ पीव्हीसी पाईप आल्या आहेत. तीन ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगचे काम असल्याने विलंब लागत आहे.५० वाघिणींतून पाणी देण्याचा प्रयत्नमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जलशुद्धीकरण केंद्रात क्रॉस कनेक्शनच्या मुख्य जोडणीचे काम पूर्ण झाले. तसेच, कोल्हापूर रेल्वे रुळाखालून जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. एकाचवेळी २५ वाघिणींमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हैदरखान विहीर ते यार्डापर्यंत जलवाहिनीचे काम सुरू करण्यात आले असून हे संपूर्ण काम सोमवारपर्यंतपूर्ण होण्याची शक्यता आहे. लातूरला विक्रमी वेळेत पाणी पोहोचले असले तरी, ५० वाघिणींतून पाणी देण्यासाठी प्रयत्न आहे व तो येत्या दोन दिवसात पूर्णत्वास येणार आहे. लातूरला पाणी देण्यात सांगलीकरांनी दाखविलेले दातृत्व अभिमानास्पद आहे. केवळ पाच दिवसांच्या नियोजनातून लातूरला पाणी देण्यात यश आल्याने, आता पूर्ण क्षमतेने ५० वाघिणींच्या माध्यमातून पाणी देण्याचे नियोजन पूर्णत्वास येत आहे. सोमवारपर्यंत काम पूर्ण झाल्यास मंगळवारपासून लातूरला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात कोणतीही अडचण नाही. - मकरंद देशपांडे, योजनेचे प्रणेते