शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

लातूरमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात वृक्ष लागवडीची स्पर्धा; विजेत्या गणेश मंडळांचा होणार गौरव

By हरी मोकाशे | Updated: August 30, 2022 13:46 IST

यंदाच्या गणेशोत्सवात लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड स्पर्धेचे आयोजन

लातूर : वृक्ष लागवड केवळ शासन, ग्रामपंचायतनेच करणे अपेक्षित नाही. त्यात गावातील प्रत्येक व्यक्ती, संस्था तसेच मंडळांचा सहभाग असावा म्हणून यंदाच्या गणेशोत्सवात जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड स्पर्धा होत आहे. सर्वाधिक वृक्ष लागवड करणाऱ्या मंडळांचा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे.

यंदाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेने ५३.३९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायतकडून वृक्ष लागवड केली जात आहे. मोहिमेत सर्वजण सहभागी व्हावे आणि ती लोकचळवळ व्हावी म्हणून यंदा जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याबरोबरच मंडळांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धे अंतर्गत प्रत्येक पंचायत समिती व जिल्हा परिषद गटात सर्वाधिक वृक्ष लागवड करणाऱ्या पहिल्या तीन मंडळांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात जी मंडळी सर्वाधिक वृक्ष लागवड करतील अशा पहिल्या तीन मंडळांचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गणेश मंडळांनी वृक्ष लागवड स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

वनक्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न...जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे. ते वाढवण्यासाठी शासन प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवात विविध मंडळाकडून सामाजिक प्रबोधनाचा जागर घालण्यात येतो. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. वृक्ष लागवड व संवर्धन ही लोकचळवळ निर्माण करण्यात गणेश मंडळांची मोलाची भूमिका राहणार आहे. त्यामुळे मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे.- दत्तात्रय गिरी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवlaturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषदenvironmentपर्यावरण