शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

लातूर मनपाच्या प्रवेशद्वारात दिव्यांगांचे तिरडी आंदोलन; हलगी वाजवत प्रतीकात्मक अंत्ययात्रा

By आशपाक पठाण | Updated: February 21, 2024 18:23 IST

मनपाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने समोर बसलेल्या आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काय आहेत दिव्यांगांच्या मागण्या?

लातूर : लातूर शहर महानगरपालिका मागील वर्षभरापासून दिव्यांगांचा पाच टक्के विकास निधी वाटप करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठानच्या वतीने निधी वाटप तत्काळ करावा, या मागणीसाठी बुधवारी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर तिरडी आंदोलन करण्यात आले. आक्रमक झालेल्या आंदोलकांना जवळपास एक तासानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर माघार घेण्यात आली.

अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अहेमद हरणमारे यांच्या नेतृत्वात मनपा प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले. आंदोलन करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने शासन निर्णयानुसार दरवर्षी दिव्यांगांच्या विकासासाठी पाच टक्के निधी आर्थिक स्वरूपात देण्याची तरतूद असताना मनपा प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आर्थिक वर्ष मार्च महिन्याला पूर्ण होते, तरी अद्यापपर्यंत दिव्यांगांच्या निधीकडे मनपा गांभीर्याने पाहत नसल्याने बुधवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शहरातील शेकडो दिव्यांगांनी तिरडीसह प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मनपाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने समोर बसलेल्या आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत मनपा आयुक्त समोर येणार नाहीत, तोपर्यंत माघार नाही, असा निर्णय आंदोलकांनी घेतला. काही वेळात महापालिका प्रशासनाचे प्रतिनिधी रुक्मानंद वडगावे आंदोलनस्थळी आले. त्यांनी मनपा उपायुक्तांनी लेखी दिलेले आश्वासन वाचून दाखवत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी निसार शेख, शारदा बेद्रे, वैशाली शिंदे, अन्सार हरणमारे, मतीन शेख, योगिराज संकाये यांच्यासह शेकडो दिव्यांग उपस्थित होते.

मार्च एण्डपर्यंत सर्वांनाच लाभ मिळणारलातूर शहर महापालिका दिव्यांग कल्याण या लेखाशीर्षाखाली दरवर्षी ५ टक्के निधी राखीव ठेवते. मनपाला महसुली उत्पन्नातून बांधील खर्च वजा जाता शिल्लक राहिलेल्या निधीत ५ टक्के निधी दिव्यांगासाठी खर्चाची तरतूद आहे. त्यानुसार यंदा जवळपास ७० लाखांची तरतूद आहे. यात ६७ जणांना चलनवलन साहित्यासाठी १० लाखांचा निधी वाटप केला आहे. जे लाभार्थी यादीत राहिले आहेत, त्यांना दोन टप्प्यात १८ मार्चपर्यंत २००, ३१ मार्चपूर्वी १९९ जणांना लाभ दिला जाईल, असे लेखी आश्वासन मनपा उपायुक्तांच्या स्वाक्षरीने आंदोलकांना देण्यात आले. मनपाचे महिला व बालविकास अधिकारी रुक्मानंद वडगावे यांनी आंदोलकांशी चर्चा करून लेखी पत्र दिले.

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलन