शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

लातूर मनपाच्या प्रवेशद्वारात दिव्यांगांचे तिरडी आंदोलन; हलगी वाजवत प्रतीकात्मक अंत्ययात्रा

By आशपाक पठाण | Updated: February 21, 2024 18:23 IST

मनपाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने समोर बसलेल्या आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काय आहेत दिव्यांगांच्या मागण्या?

लातूर : लातूर शहर महानगरपालिका मागील वर्षभरापासून दिव्यांगांचा पाच टक्के विकास निधी वाटप करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठानच्या वतीने निधी वाटप तत्काळ करावा, या मागणीसाठी बुधवारी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर तिरडी आंदोलन करण्यात आले. आक्रमक झालेल्या आंदोलकांना जवळपास एक तासानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर माघार घेण्यात आली.

अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अहेमद हरणमारे यांच्या नेतृत्वात मनपा प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले. आंदोलन करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने शासन निर्णयानुसार दरवर्षी दिव्यांगांच्या विकासासाठी पाच टक्के निधी आर्थिक स्वरूपात देण्याची तरतूद असताना मनपा प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आर्थिक वर्ष मार्च महिन्याला पूर्ण होते, तरी अद्यापपर्यंत दिव्यांगांच्या निधीकडे मनपा गांभीर्याने पाहत नसल्याने बुधवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शहरातील शेकडो दिव्यांगांनी तिरडीसह प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मनपाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने समोर बसलेल्या आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत मनपा आयुक्त समोर येणार नाहीत, तोपर्यंत माघार नाही, असा निर्णय आंदोलकांनी घेतला. काही वेळात महापालिका प्रशासनाचे प्रतिनिधी रुक्मानंद वडगावे आंदोलनस्थळी आले. त्यांनी मनपा उपायुक्तांनी लेखी दिलेले आश्वासन वाचून दाखवत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी निसार शेख, शारदा बेद्रे, वैशाली शिंदे, अन्सार हरणमारे, मतीन शेख, योगिराज संकाये यांच्यासह शेकडो दिव्यांग उपस्थित होते.

मार्च एण्डपर्यंत सर्वांनाच लाभ मिळणारलातूर शहर महापालिका दिव्यांग कल्याण या लेखाशीर्षाखाली दरवर्षी ५ टक्के निधी राखीव ठेवते. मनपाला महसुली उत्पन्नातून बांधील खर्च वजा जाता शिल्लक राहिलेल्या निधीत ५ टक्के निधी दिव्यांगासाठी खर्चाची तरतूद आहे. त्यानुसार यंदा जवळपास ७० लाखांची तरतूद आहे. यात ६७ जणांना चलनवलन साहित्यासाठी १० लाखांचा निधी वाटप केला आहे. जे लाभार्थी यादीत राहिले आहेत, त्यांना दोन टप्प्यात १८ मार्चपर्यंत २००, ३१ मार्चपूर्वी १९९ जणांना लाभ दिला जाईल, असे लेखी आश्वासन मनपा उपायुक्तांच्या स्वाक्षरीने आंदोलकांना देण्यात आले. मनपाचे महिला व बालविकास अधिकारी रुक्मानंद वडगावे यांनी आंदोलकांशी चर्चा करून लेखी पत्र दिले.

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलन