शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमास जाताना दुचाकीवरील तिघांना ट्रकने उडवले; एकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:35 IST

परभणी - जहिराबाद महामार्गावरील मुगाव पाटीजवळची घटना

निलंगा (जि. लातूर) : पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमास जाताना दुचाकीवरील तिघांना ट्रकने चिरडल्याची घटना परभणी - जहिराबाद महामार्गावरील मुगाव पाटीजवळ गुरुवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात मधुकर बाजीराव व्हरगळे (७०, रा. जाऊवाडी, ता. निलंगा) हे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

निलंगा तालुक्यातील जाऊवाडी येथील मधुकर बाजीराव व्हरगळे, दत्ता गिरीजप्पा डोरले व अशोक ग्यानदेव व्हरगळे हे तिघे निटूर येथील पाहुण्यांच्या घरी घरगुती कार्यक्रमासाठी गुरुवारी सकाळी दुचाकी (एमएच २४ एएन १८९८) वरुन निघाले होते. परभणी - जहिराबाद महामार्गावरील मुगाव पाटीजवळ आले असताना भरधाव वेगातील ट्रक (केए ३९ ए ००२७) ने जोराची धडक दिली. त्यात दुचाकी मधुकर व्हरगळे ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडले. या अपघातात दत्ता गिरीजप्पा डोरले (५५) व अशोक ग्यानदेव व्हरगळे (६५, रा. जाऊवाडी) हे गंभीर जखमी झाले. त्यातील एकास उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मधुकर व्हरगळे यांच्या पार्थिवाचे विच्छेदन निटूरच्या प्राथमिक उपकेंद्रात करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. अधिक तपास शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे व निटूर चौकीचे बीट जमादार सुधीर शिंदे हे करीत आहेत.

परभणी - जहिराबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळादळणवळण सुलभ व्हावे म्हणून परभणी - जहिराबाद महामार्ग बनविण्यात आला आहे. मात्र, हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पाच वर्षांत छोटे - मोठे अनेक अपघात झाले आहेत. त्यात दोनशेहून अधिक प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

रस्त्याच्या मधोमध भेगामहामार्गाच्या मधोमध मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे दुचाकीचे टायर रुतून अनेक अपघात घडले आहेत. लातूरनजीकच्या बाभळगाव ते औराद शहाजनीपर्यंतच्या महामार्गावर शेकडो खड्डे पडले असून, बहुतांश ठिकाणी भेगा पडल्या आहेत. तसेच या मार्गावर ठिकठिकाणी सूचना फलकही नसल्याचे पाहावयास मिळत आहे. अपघात घडल्यानंतर नागरिक आक्रमक झाले की, संबंधितांकडून तात्पुरती डागडुजी केली जाते. त्यानंतर मात्र दुर्लक्ष करण्यात येते.

अधिकाऱ्यांकडून देखावाएखादा अपघात घडल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी येऊन पाहणी करतात. तसेच संबंधित गुत्तेदारही दुरुस्ती केल्याचा दिखावा करतो. त्यानंतर मात्र, जैसे थे परिस्थिती राहते. या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी विविध पक्ष, संघटना व नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. मात्र, प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

टोलनाके काढून टाकाया महामार्गावरील पानचिंचोली येथे, तर निलंगा - लातूर मार्गावरील चलबुर्गा पाटीजवळ टोलनाका उभारण्यात आला आहे. मात्र, हा टोलनाका सुरुवातीपासून बंद आहे. मात्र, टोलनाक्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, वाहनांना ये-जा करण्यास मोठी अडचण होत आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात होत असतात. हा टोलनाका काढून वाहतुकीसाठी रस्ता खुला करावा, अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघात