शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

जनादेश नसलेले तीन पक्षांचे सरकार घाबरट - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 17:42 IST

अतिवृष्टीसाठी सरकारने १० हजार रुपये देण्याची केलेली घोषणा फसवी असून ही रक्कम तुटपुंजी आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाचे गांभीर्य नाही. या सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातात

लातूर : जनादेश नसताना महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार सत्तेत आले आहे. या सरकारने राज्याची वाट लावली असून, केवळ घोषणा केल्या जातात; परंतु अंमलबजावणी होत नाही, सरकार घाबरट आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. 

पाटील म्हणाले, राज्य सरकारमध्ये सावळागोंधळ आहे. त्यांना मराठा आरक्षणाचे गांभीर्य नाही. सारथी संस्थेसाठी आर्थिक तरतूद नाही. अण्णासाहेब  पाटील आर्थिक विकास महामंडळही बरखास्त केले आहे. या सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. आता नागपूर अधिवेशन मुंबईत घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरातच झाले पाहिजे, तसेच अतिवृष्टीसाठी सरकारने १० हजार रुपये देण्याची केलेली घोषणा फसवी असून ही रक्कम तुटपुंजी आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांंनी एकरी २५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. या मागणीचा आता त्यांना का विसर पडला? असेही ते म्हणाले.

पत्रपरिषदेला माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, माजी आ. सुधाकर भालेराव, माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाState Governmentराज्य सरकार