शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे काहिली! वन विभागाच्या पाणवठ्यांवर भागतेय वन्यजिवांची तहान

By हरी मोकाशे | Updated: April 6, 2024 18:55 IST

गेल्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि वाढत्या उन्हामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

लातूर : वाढत्या उन्हामुळे जिवाची काहिली होत आहे. त्यातच पाण्याची समस्या गंभीर होत आहे. दरम्यान, वन्यजिवांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, म्हणून वन विभागाने जिल्ह्यात १५६ पाणवठे तयार करून तिथे टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची होणारी भटकंती थांबण्यास मदत होत आहे.

गेल्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि वाढत्या उन्हामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सध्या जिल्ह्यातील २४७ गावे आणि ४२ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने ९४ गावे आणि २५ वाड्यांसाठी १३२ अधिग्रहणे करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर सात गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महिनाभरापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जलस्रोत आटू लागले आहेत, तर जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे वन्यजिवांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पाहून वन विभागाने पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात ५ हजार हेक्टर वनक्षेत्रजिल्ह्यात जवळपास ५ हजार हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे. त्यात मोठे जंगल आहे. या विस्तीर्ण जंगलात मोर, हरिण, लांडगा, ससे, रानडुक्कर, वानर, मुंगूस, साप, सायाळ, कोल्हा, रानकुत्रे, खवले मांजर, काळवीट, गरुड अशा पशू- पक्ष्यांचा अधिवास आहे. या पशू- पक्ष्यांच्या पाण्यासाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

टँकरने केला जातो पाणीपुरवठाशासनाच्या निधीतून १५६ पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. त्यात टँकरद्वारे पाणी टाकण्यात येते. प्रत्येक पाणवठ्याचे दर चार दिवसाला प्रत्यक्षात निरीक्षण केले जाते. शिवाय, ट्रॅप कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर गायी- म्हशी, शेळ्या- मेंढ्या, अशा पशुधनासाठी वनक्षेत्राच्या बाहेर सिमेंटचे हौद तयार करण्यात आले आहेत. तिथेही नियमित पाणी टाकण्यात येते, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे यांनी सांगितले.

पक्ष्यांच्या तलावावर घिरट्या...प्रत्येक पाणवठ्यामध्ये नियमित पाणी ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच दर चार दिवसांनी पाणवठ्यांचे निरीक्षण केले जाते. नागरिकांनीही पक्ष्यांसाठी घराच्या परिसरात येळण्या बांधाव्यात आणि त्यात नियमितपणे पाणी टाकावे. विशेष म्हणजे, बहुतांश पक्षी हे तलावातील पाणी पीत असतात. त्यामुळे तिथे सर्वाधिक घिरट्या घालत असतात.-सचिन रामपुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी

टॅग्स :laturलातूरforestजंगल