शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उन्हामुळे काहिली! वन विभागाच्या पाणवठ्यांवर भागतेय वन्यजिवांची तहान

By हरी मोकाशे | Updated: April 6, 2024 18:55 IST

गेल्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि वाढत्या उन्हामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

लातूर : वाढत्या उन्हामुळे जिवाची काहिली होत आहे. त्यातच पाण्याची समस्या गंभीर होत आहे. दरम्यान, वन्यजिवांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, म्हणून वन विभागाने जिल्ह्यात १५६ पाणवठे तयार करून तिथे टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची होणारी भटकंती थांबण्यास मदत होत आहे.

गेल्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि वाढत्या उन्हामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सध्या जिल्ह्यातील २४७ गावे आणि ४२ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने ९४ गावे आणि २५ वाड्यांसाठी १३२ अधिग्रहणे करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर सात गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महिनाभरापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जलस्रोत आटू लागले आहेत, तर जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे वन्यजिवांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पाहून वन विभागाने पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात ५ हजार हेक्टर वनक्षेत्रजिल्ह्यात जवळपास ५ हजार हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे. त्यात मोठे जंगल आहे. या विस्तीर्ण जंगलात मोर, हरिण, लांडगा, ससे, रानडुक्कर, वानर, मुंगूस, साप, सायाळ, कोल्हा, रानकुत्रे, खवले मांजर, काळवीट, गरुड अशा पशू- पक्ष्यांचा अधिवास आहे. या पशू- पक्ष्यांच्या पाण्यासाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

टँकरने केला जातो पाणीपुरवठाशासनाच्या निधीतून १५६ पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. त्यात टँकरद्वारे पाणी टाकण्यात येते. प्रत्येक पाणवठ्याचे दर चार दिवसाला प्रत्यक्षात निरीक्षण केले जाते. शिवाय, ट्रॅप कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर गायी- म्हशी, शेळ्या- मेंढ्या, अशा पशुधनासाठी वनक्षेत्राच्या बाहेर सिमेंटचे हौद तयार करण्यात आले आहेत. तिथेही नियमित पाणी टाकण्यात येते, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे यांनी सांगितले.

पक्ष्यांच्या तलावावर घिरट्या...प्रत्येक पाणवठ्यामध्ये नियमित पाणी ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच दर चार दिवसांनी पाणवठ्यांचे निरीक्षण केले जाते. नागरिकांनीही पक्ष्यांसाठी घराच्या परिसरात येळण्या बांधाव्यात आणि त्यात नियमितपणे पाणी टाकावे. विशेष म्हणजे, बहुतांश पक्षी हे तलावातील पाणी पीत असतात. त्यामुळे तिथे सर्वाधिक घिरट्या घालत असतात.-सचिन रामपुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी

टॅग्स :laturलातूरforestजंगल