शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

उन्हामुळे काहिली! वन विभागाच्या पाणवठ्यांवर भागतेय वन्यजिवांची तहान

By हरी मोकाशे | Updated: April 6, 2024 18:55 IST

गेल्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि वाढत्या उन्हामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

लातूर : वाढत्या उन्हामुळे जिवाची काहिली होत आहे. त्यातच पाण्याची समस्या गंभीर होत आहे. दरम्यान, वन्यजिवांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, म्हणून वन विभागाने जिल्ह्यात १५६ पाणवठे तयार करून तिथे टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची होणारी भटकंती थांबण्यास मदत होत आहे.

गेल्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि वाढत्या उन्हामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सध्या जिल्ह्यातील २४७ गावे आणि ४२ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने ९४ गावे आणि २५ वाड्यांसाठी १३२ अधिग्रहणे करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर सात गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महिनाभरापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जलस्रोत आटू लागले आहेत, तर जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे वन्यजिवांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पाहून वन विभागाने पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात ५ हजार हेक्टर वनक्षेत्रजिल्ह्यात जवळपास ५ हजार हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे. त्यात मोठे जंगल आहे. या विस्तीर्ण जंगलात मोर, हरिण, लांडगा, ससे, रानडुक्कर, वानर, मुंगूस, साप, सायाळ, कोल्हा, रानकुत्रे, खवले मांजर, काळवीट, गरुड अशा पशू- पक्ष्यांचा अधिवास आहे. या पशू- पक्ष्यांच्या पाण्यासाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

टँकरने केला जातो पाणीपुरवठाशासनाच्या निधीतून १५६ पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. त्यात टँकरद्वारे पाणी टाकण्यात येते. प्रत्येक पाणवठ्याचे दर चार दिवसाला प्रत्यक्षात निरीक्षण केले जाते. शिवाय, ट्रॅप कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर गायी- म्हशी, शेळ्या- मेंढ्या, अशा पशुधनासाठी वनक्षेत्राच्या बाहेर सिमेंटचे हौद तयार करण्यात आले आहेत. तिथेही नियमित पाणी टाकण्यात येते, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे यांनी सांगितले.

पक्ष्यांच्या तलावावर घिरट्या...प्रत्येक पाणवठ्यामध्ये नियमित पाणी ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच दर चार दिवसांनी पाणवठ्यांचे निरीक्षण केले जाते. नागरिकांनीही पक्ष्यांसाठी घराच्या परिसरात येळण्या बांधाव्यात आणि त्यात नियमितपणे पाणी टाकावे. विशेष म्हणजे, बहुतांश पक्षी हे तलावातील पाणी पीत असतात. त्यामुळे तिथे सर्वाधिक घिरट्या घालत असतात.-सचिन रामपुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी

टॅग्स :laturलातूरforestजंगल