शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अदानींचे नुकसान नको म्हणून सोयाबीनला दर नाही; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 16:54 IST

गरिबांना लुटणाऱ्या सरकारला जनता धडा शिकवेल.

लातूर / अहमदपूर : सोयाबीन तेल उत्पादन करणाऱ्या अदानींचे नुकसान होऊ नये म्हणून सरकार सोयाबीनचे दर वाढू देत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आत्महत्या वाढल्या आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे केला.

अहमदपूरच्या सभेत तसेच लातूर येथील पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी भाजपा सरकारवर टीका केली. ते म्हणाले, नागरिकांना आता बदल हवा आहे. काँग्रेसवर लोकांचा विश्वास वाढला आहे. जुमलेबाज सरकार पायउतार होईल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकात दिलेल्या पाच गॅरंटी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे गरिबांना लुटणाऱ्या सरकारला जनता धडा शिकवेल. अहमदपूरच्या सभेत ते म्हणाले, देशात महिला सुरक्षित नाहीत. लातुरात भाग्यश्री सुडे या युवतीची हत्या झाली. त्यावर खासदार बोलत नाहीत. भाजप सरकारने सोयाबीन, कापसाला भाव देण्याची घोषणा केली. परंतु, दहा वर्षांत भाववाढ सोडा, उलट कमी झाले.

स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांची भलावन करणारे आता आपण खरे देशभक्त आहोत, असे म्हणत आहेत. सध्या देशात जुलमी राजवट सुरू असून, विकास न करता यापूर्वी शहिदांची नावे घेऊन निवडणूक जिंकली. आता प्रभू श्रीरामाचे नाव घेत मते मागत आहात. दहा वर्षांत काहीच न करता धनदांडग्यांना देश विकण्यासाठी सरकार चालविले, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

पत्रपरिषदेला श्रीशैल उटगे, विद्या पाटील उपस्थित होत्या. तर सभेला काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, उमेदवार माजी मंत्री आ. अमित देशमुख, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, उमेदवार डॉ. शिवाजी काळगे उपस्थित होते.

पक्ष फोडले, खिडक्या चोरल्यासरकारने शिवसेना पक्ष फोडला. शरद पवार यांचे घर फोडले. काँग्रेसच्या काही खिडक्या चोरल्या, अशी टीका माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी केली.

टॅग्स :latur-pcलातूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार