शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

टेम्पो पाठीमागे घेताना महिला चिरडली; संतप्त गावकऱ्यांनी रोखला रस्ता

By हरी मोकाशे | Updated: December 16, 2022 17:29 IST

लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील कोळगाव तांड्याजवळ टेम्पो पाठीमागे घेताना एका महिलेचा चिरडून जागीच मृत्यू झाला.

लातूर :

लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील कोळगाव तांड्याजवळ टेम्पो पाठीमागे घेताना एका महिलेचा चिरडून जागीच मृत्यू झाला. त्यामुळे तांड्यावरील संतप्त नागरिकांनी महामार्ग अर्धातास रोखून धरला होता. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वा. च्या सुमारास घडली.

शांताबाई रतन राठोड (५५, रा. कोळगाव तांडा, ता. रेणापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील कोळगाव तांड्याकडे शांताबाई रतन राठोड ही महिला शुक्रवारी दुपारी डोक्यावर गवताचा भारा घेऊन येत होती. तेव्हा तेव्हा लातूरहून अंबाजोगाईकडे टेम्पो (एमएच १६, क्यू २२९६) हा जात होता. दरम्यान, याच मार्गावर पलिकडील बाजूस वाहतूक पोलीस अधिक प्रमाणात मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत होते. पोलिसांनी या टेम्पोस थांबविले. तेव्हा चालकाने पुढे गेलेला टेम्पो मागे घेत असताना सदरील महिलेस पाठीमागून धक्का बसला. त्यामुळे ती पडली आणि काही क्षणातच तिच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने चिरडली.

या घटनेची माहिती मिळताच कोळगाव तांड्यावरील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, रेणापूर ठाण्याचे पोनि. दीपक शिंदे, कर्मचारी बाळासाहेब कन्हेरे, गौतम कांबळे आदी घटनास्थळी दाखल झाले. ज्यांच्यामुळे ही घडली, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत कोळगाव तांड्यावरील नागरिकांनी अर्धा तास महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होते. सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.

वाहतूक पोलिसांमुळे अपघात झाल्याचा आरोप...महामार्गावर वाहन तपासणी व कारवाईसाठी वाहतूक पोलीस होते. त्यांनी टेम्पोस थांबविले. त्यामुळे चालकाने टेम्पो पाठीमागे घेताना ही घटना घडली. वाहतूक पोलिसांमुळे ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी करुन कारवाई करावी म्हणून रस्तारोको केला.

दोषींवर कठोर कारवाई...अपघाचा संपूर्ण घटनाक्रम तपासून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी ग्रामस्थांना सांगितले. वाहतूक पोलिसांची व्हॅन व ते कर्मचारी सध्या रेणापूर ठाण्यात आहेत, असे सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात