शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेणाचे चार दरवाजे उघडले; ऊस, पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला

By हरी मोकाशे | Updated: May 27, 2023 17:31 IST

नदीकाठचे शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेणापूर : उन्हाळी पीक आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांकडून रेणा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी होत होती. त्यानुसार प्रशासनाने शुक्रवारी रेणा प्रकल्पाचे चार दरवाजे १० सेमीने उघडून रेणा नदी पात्रात २९.०४ क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु केला. त्यामुळे नदीवरील रेणापूर, घनसरगाव व खरोळा येथील तीन बॅरेज तुडुंब भरले आहेत. शिवाय, ऊसासह उन्हाळी पीक आणि पशुधनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे.

गत पावसाळ्यात रेणापूर तालुक्यात अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्पात मुबलक प्रमाणात जलसाठा झाला होता. त्यामुळे प्रकल्पातून अकरावेळा पाणी रेणा नदी पात्रात सोडण्यात आले होते. दरम्यान, आता बाराव्यांदा पाणी सोडण्याची वेळ आहे. दरम्यान, रेणा नदी पात्रात पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

रेणा नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीवरील घनसरगाव, रेणापूर व जवळगा (खरोळा) हे तिन्ही बॅरेजेस तुडुंब भरले आहेत. दरम्यान, नदीकाठचे शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पाण्याचा उपयोग ऊस व उन्हाळी पिकांना होणार आहे. तसेच पशुधनास पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

आठवडाभरापूर्वीच पाण्याचे नियोजन...रेणा मध्यम प्रकल्पातून नदी पात्रात २० मे रोजी पाणी सोडण्यात येणार होते. परंतु, घनसरगाव जवळ पुलाचे काम सुरू असल्याने किमान १० दिवस तरी प्रकल्पातून पाणी सोडू नये म्हणून नागरिकांनी नदी पात्रात ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे प्रशासनाने १० दिवसांची मुदत दिली होती. पुलाच्या फाऊंडेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडण्यात आले. नदी पात्रात पाणी असले तरी पुलाचे काम सुरु राहणार आहे.

एकाच वर्षात पाणी सोडण्याची १२ वी वेळ...आतापर्यंत रेणा प्रकल्पातून १० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच वारंवार पाणी सोडावे लागले आहे. पावसाळ्यात प्रकल्पात पाण्याचा ओघ वाढत राहिल्याने प्रकल्पाचे कधी दोन, कधी चार तर कधी सहा दरवाजे १० सेमीने उघडले गेले होते. जूनमध्ये दोनदा, ऑगस्टमध्ये एकदा, सप्टेंबरमध्ये पाचदा तर ऑक्टोबरमध्ये चारदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आता ही बारावी वेळ आहे.- श्रीनाथ कुलकर्णी, शाखा अभियंता.

 

टॅग्स :laturलातूरagricultureशेतीWaterपाणी