शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेणाचे चार दरवाजे उघडले; ऊस, पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला

By हरी मोकाशे | Updated: May 27, 2023 17:31 IST

नदीकाठचे शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेणापूर : उन्हाळी पीक आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांकडून रेणा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी होत होती. त्यानुसार प्रशासनाने शुक्रवारी रेणा प्रकल्पाचे चार दरवाजे १० सेमीने उघडून रेणा नदी पात्रात २९.०४ क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु केला. त्यामुळे नदीवरील रेणापूर, घनसरगाव व खरोळा येथील तीन बॅरेज तुडुंब भरले आहेत. शिवाय, ऊसासह उन्हाळी पीक आणि पशुधनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे.

गत पावसाळ्यात रेणापूर तालुक्यात अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्पात मुबलक प्रमाणात जलसाठा झाला होता. त्यामुळे प्रकल्पातून अकरावेळा पाणी रेणा नदी पात्रात सोडण्यात आले होते. दरम्यान, आता बाराव्यांदा पाणी सोडण्याची वेळ आहे. दरम्यान, रेणा नदी पात्रात पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

रेणा नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीवरील घनसरगाव, रेणापूर व जवळगा (खरोळा) हे तिन्ही बॅरेजेस तुडुंब भरले आहेत. दरम्यान, नदीकाठचे शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पाण्याचा उपयोग ऊस व उन्हाळी पिकांना होणार आहे. तसेच पशुधनास पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

आठवडाभरापूर्वीच पाण्याचे नियोजन...रेणा मध्यम प्रकल्पातून नदी पात्रात २० मे रोजी पाणी सोडण्यात येणार होते. परंतु, घनसरगाव जवळ पुलाचे काम सुरू असल्याने किमान १० दिवस तरी प्रकल्पातून पाणी सोडू नये म्हणून नागरिकांनी नदी पात्रात ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे प्रशासनाने १० दिवसांची मुदत दिली होती. पुलाच्या फाऊंडेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडण्यात आले. नदी पात्रात पाणी असले तरी पुलाचे काम सुरु राहणार आहे.

एकाच वर्षात पाणी सोडण्याची १२ वी वेळ...आतापर्यंत रेणा प्रकल्पातून १० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच वारंवार पाणी सोडावे लागले आहे. पावसाळ्यात प्रकल्पात पाण्याचा ओघ वाढत राहिल्याने प्रकल्पाचे कधी दोन, कधी चार तर कधी सहा दरवाजे १० सेमीने उघडले गेले होते. जूनमध्ये दोनदा, ऑगस्टमध्ये एकदा, सप्टेंबरमध्ये पाचदा तर ऑक्टोबरमध्ये चारदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आता ही बारावी वेळ आहे.- श्रीनाथ कुलकर्णी, शाखा अभियंता.

 

टॅग्स :laturलातूरagricultureशेतीWaterपाणी