शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

घरातील कर्ता व्यक्ती गेला, तुटलेल्या विद्युत वाहिनीने घेतला शेतकऱ्याचा बळी

By हरी मोकाशे | Updated: February 24, 2023 16:36 IST

बांधावर आग लागली, शेतकरी गडबडीने निघाला; तुटलेल्या विद्युतवाहिनीच्या स्पर्शाने गेला बळी

हाळी हंडरगुळी (जि. लातूर) : शेताच्या बांधावरील गवताला आग लागल्याचे पाहून ती आटोक्यात आणण्यासाठी गडबडीने जात असलेल्या एका शेतकऱ्याचा स्पर्श तुटलेल्या विद्युत वाहिनीला झाला आणि त्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे मोरतळवाडी (ता. उदगीर) येथे घडली.

रामराव गणपती पेद्देवाड (६०, रा. मोरतळवाडी, ता. उदगीर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मोरतळवाडी येथील शेतकरी रामराव पेद्देवाड हे शुक्रवारी पहाटेच्या वेळी शेतातील पिकास पाणी देण्यासाठी गेले होते. तेव्हा काही अंतरावर असलेल्या बांधावरील गवतास आग लागल्याचे त्यांनी पाहिले. बांधानजिक उभा ऊस असल्याने त्यास आग लागेल या भीतीपोटी त्यांनी गडबडीने बांधावरील आग आटोक्यात आणण्यासाठी जात होते. तेव्हा शेतात विजेची तुटलेली तार पडली होती. त्या विद्युुत तारेस त्यांचा स्पर्श झाल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी उशिरापर्यंत पेद्देवाड हे घरी न आल्याने कुटुंबियांनी शेताकडे जाऊन पाहणी केली असता रामराव पेद्देवाड यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळ त्यांनी घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेस्थळी पोहोचून पंचनामा केला.

घरातील कर्ता व्यक्ती गेला...रामराव पेद्देवाड यांना पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे विवाह झाले आहेत. त्यांना सहा एकर शेती असून त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे ते शेतीत काबाडकष्ट करायचे. मुलगा हा शिक्षण घेत आहे. दरम्यान, ही घटना घडली आहे. या घटनेत कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीDeathमृत्यू