शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

घरातील कर्ता व्यक्ती गेला, तुटलेल्या विद्युत वाहिनीने घेतला शेतकऱ्याचा बळी

By हरी मोकाशे | Updated: February 24, 2023 16:36 IST

बांधावर आग लागली, शेतकरी गडबडीने निघाला; तुटलेल्या विद्युतवाहिनीच्या स्पर्शाने गेला बळी

हाळी हंडरगुळी (जि. लातूर) : शेताच्या बांधावरील गवताला आग लागल्याचे पाहून ती आटोक्यात आणण्यासाठी गडबडीने जात असलेल्या एका शेतकऱ्याचा स्पर्श तुटलेल्या विद्युत वाहिनीला झाला आणि त्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे मोरतळवाडी (ता. उदगीर) येथे घडली.

रामराव गणपती पेद्देवाड (६०, रा. मोरतळवाडी, ता. उदगीर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मोरतळवाडी येथील शेतकरी रामराव पेद्देवाड हे शुक्रवारी पहाटेच्या वेळी शेतातील पिकास पाणी देण्यासाठी गेले होते. तेव्हा काही अंतरावर असलेल्या बांधावरील गवतास आग लागल्याचे त्यांनी पाहिले. बांधानजिक उभा ऊस असल्याने त्यास आग लागेल या भीतीपोटी त्यांनी गडबडीने बांधावरील आग आटोक्यात आणण्यासाठी जात होते. तेव्हा शेतात विजेची तुटलेली तार पडली होती. त्या विद्युुत तारेस त्यांचा स्पर्श झाल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी उशिरापर्यंत पेद्देवाड हे घरी न आल्याने कुटुंबियांनी शेताकडे जाऊन पाहणी केली असता रामराव पेद्देवाड यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळ त्यांनी घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेस्थळी पोहोचून पंचनामा केला.

घरातील कर्ता व्यक्ती गेला...रामराव पेद्देवाड यांना पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे विवाह झाले आहेत. त्यांना सहा एकर शेती असून त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे ते शेतीत काबाडकष्ट करायचे. मुलगा हा शिक्षण घेत आहे. दरम्यान, ही घटना घडली आहे. या घटनेत कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीDeathमृत्यू