शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

घरातील कर्ता व्यक्ती गेला, तुटलेल्या विद्युत वाहिनीने घेतला शेतकऱ्याचा बळी

By हरी मोकाशे | Updated: February 24, 2023 16:36 IST

बांधावर आग लागली, शेतकरी गडबडीने निघाला; तुटलेल्या विद्युतवाहिनीच्या स्पर्शाने गेला बळी

हाळी हंडरगुळी (जि. लातूर) : शेताच्या बांधावरील गवताला आग लागल्याचे पाहून ती आटोक्यात आणण्यासाठी गडबडीने जात असलेल्या एका शेतकऱ्याचा स्पर्श तुटलेल्या विद्युत वाहिनीला झाला आणि त्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे मोरतळवाडी (ता. उदगीर) येथे घडली.

रामराव गणपती पेद्देवाड (६०, रा. मोरतळवाडी, ता. उदगीर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मोरतळवाडी येथील शेतकरी रामराव पेद्देवाड हे शुक्रवारी पहाटेच्या वेळी शेतातील पिकास पाणी देण्यासाठी गेले होते. तेव्हा काही अंतरावर असलेल्या बांधावरील गवतास आग लागल्याचे त्यांनी पाहिले. बांधानजिक उभा ऊस असल्याने त्यास आग लागेल या भीतीपोटी त्यांनी गडबडीने बांधावरील आग आटोक्यात आणण्यासाठी जात होते. तेव्हा शेतात विजेची तुटलेली तार पडली होती. त्या विद्युुत तारेस त्यांचा स्पर्श झाल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी उशिरापर्यंत पेद्देवाड हे घरी न आल्याने कुटुंबियांनी शेताकडे जाऊन पाहणी केली असता रामराव पेद्देवाड यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळ त्यांनी घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेस्थळी पोहोचून पंचनामा केला.

घरातील कर्ता व्यक्ती गेला...रामराव पेद्देवाड यांना पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे विवाह झाले आहेत. त्यांना सहा एकर शेती असून त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे ते शेतीत काबाडकष्ट करायचे. मुलगा हा शिक्षण घेत आहे. दरम्यान, ही घटना घडली आहे. या घटनेत कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीDeathमृत्यू