शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

पावसाची उघडीप, पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By संदीप शिंदे | Updated: August 10, 2023 17:11 IST

ऑगस्ट महिन्याचा मध्यावधी आला तरी विहिरी, तलाव, विंधन विहीचे पाणी वाढलेले नाही.

किनगाव : यंदाच्या खरीप हंगामात अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. कधी मध्यम स्वरूपाचा तर कधी रिमझिम पाऊस पडला. तोही उशिराने आल्याने पेरण्यासही विलंब झाला आहे. सध्या पिके बहरात असतानाच मागील १३ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी, पिकांनी माना टाकल्या असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

किनगाव परिसरात सध्या दररोज कडक ऊन पडत असून ऑगस्ट महिन्याचा मध्यावधी आला तरी विहिरी, तलाव, विंधन विहीचे पाणी वाढलेले नाही. शेतातील नाले व बंधारे कोरडेच आहेत. मध्यम जमीनीवरील पिकांनी माना टाकल्या असून, चांगल्या प्रतीच्या जमिनीवरील पिके थोडीशी तग धरून आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते व औषधे यावर हजारो रुपयांचा खर्च केला आहे.

किनगाव मंडळामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीन, तूरीचा आहे. तर मुगाचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे ते शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पिकांना जगवण्याची धडपड करीत आहेत. मुगाला सध्या फुले आली असून, त्यावरही मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा उपलब्ध नाही ते शेतकरी हताशपणे वाळणाऱ्या पिकाकडे बघत आहेत. एकीकडे पिके वाळत आहेत तर दुसरीकडे पीक जगण्यासाठी शेतकरी धडपड करत असल्याचे चित्र आहे.

पाऊस न पडल्यास पिके हातची जाणार...चार दिवसांमध्ये पाऊस पडला नाही तर पिके हातची जातील. हजारो रुपये खर्च करून पेरलेले बी-बियाणे, पेरणीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाकडून मदतीची अपेक्षा असल्याचे देवकरा येथील शेतकरी वामनराव गुट्टे यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीlaturलातूर