शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पावसाची उघडीप, पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By संदीप शिंदे | Updated: August 10, 2023 17:11 IST

ऑगस्ट महिन्याचा मध्यावधी आला तरी विहिरी, तलाव, विंधन विहीचे पाणी वाढलेले नाही.

किनगाव : यंदाच्या खरीप हंगामात अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. कधी मध्यम स्वरूपाचा तर कधी रिमझिम पाऊस पडला. तोही उशिराने आल्याने पेरण्यासही विलंब झाला आहे. सध्या पिके बहरात असतानाच मागील १३ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी, पिकांनी माना टाकल्या असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

किनगाव परिसरात सध्या दररोज कडक ऊन पडत असून ऑगस्ट महिन्याचा मध्यावधी आला तरी विहिरी, तलाव, विंधन विहीचे पाणी वाढलेले नाही. शेतातील नाले व बंधारे कोरडेच आहेत. मध्यम जमीनीवरील पिकांनी माना टाकल्या असून, चांगल्या प्रतीच्या जमिनीवरील पिके थोडीशी तग धरून आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते व औषधे यावर हजारो रुपयांचा खर्च केला आहे.

किनगाव मंडळामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीन, तूरीचा आहे. तर मुगाचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे ते शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पिकांना जगवण्याची धडपड करीत आहेत. मुगाला सध्या फुले आली असून, त्यावरही मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा उपलब्ध नाही ते शेतकरी हताशपणे वाळणाऱ्या पिकाकडे बघत आहेत. एकीकडे पिके वाळत आहेत तर दुसरीकडे पीक जगण्यासाठी शेतकरी धडपड करत असल्याचे चित्र आहे.

पाऊस न पडल्यास पिके हातची जाणार...चार दिवसांमध्ये पाऊस पडला नाही तर पिके हातची जातील. हजारो रुपये खर्च करून पेरलेले बी-बियाणे, पेरणीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाकडून मदतीची अपेक्षा असल्याचे देवकरा येथील शेतकरी वामनराव गुट्टे यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीlaturलातूर