शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरहून परतणारा टेम्पो वळण घेताना उलटला; नांदेड जिल्ह्यातील दहा वारकरी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:45 IST

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील वारकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्ताने टेम्पो करून पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते.

औसा (जि. लातूर) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन नायगाव (जि. नांदेड)कडे परतणारे वारकरी भोजनासाठी रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील उजनीजवळ थांबले होते. भोजनानंतर निघाले असता पाठीमागे एक जण विसरला होता. त्यास आणण्यासाठी पुन्हा टेम्पो वळविताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन उलटले. त्यात दहा वारकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील वारकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्ताने टेम्पो करून पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर रविवारी मुक्काम करून ते सोमवारी सकाळी गावाकडे निघाले होते. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील उजनीजवळ पोहोचल्यानंतर भोजनासाठी ते एका हॉटेलवर थांबले. भोजन केल्यानंतर परतीच्या पुढील प्रवासाला निघाले असता टेेम्पो (एमएच २६ - सी ८८५१)तील एक वारकरी तिथेच राहिले होते. ते काही जणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चालकास सांगितले. तेव्हा चालकाने त्या वारकऱ्यास आणण्यासाठी टेम्पो वळवित असताना अचानक ताबा सुटल्याने टेम्पो उलटला. त्यात चालक राजू नागठाणे, माधव कल्याणी, साहेब माने, सचिन माने, विठ्ठल माने, पंढरी माने (रा. नायगाव, जि. नांदेड) यांच्यासह अन्य चौघे असे एकूण ९ जण जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून औसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तिघांना लातूरला हलविलेअपघातात विठ्ठल माने, राजीव नागठाणे, सचिन माने हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूरला हलविण्यात आले. किरकोळ जखमींना प्रथमोपचार करून घरी पाठविण्यात आले. घटनास्थळी भादा पोलिस ठाण्याचे ए. के. कांबळे, रतन मोरे, आनंद शिंदे, फेरोज शेख यांनी भेट देऊन भाविकांना उपचारासाठी दाखल करण्यास मदत केली.

टेम्पोत १६ वारकरीअपघातग्रस्त टेम्पोमध्ये एकूण १६ वारकरी होते. त्यातील १० जण जखमी झाले असले तरी तिघांना अधिक मार लागला आहे.

वारकऱ्यांना तत्काळ बाहेर काढलेअपघात झाल्याचे पाहताच माझ्यासह हॉटेलमधील कामगार रज्जाक शेख, अमिर शेख यांनी धाव घेतली. जखमी वारकऱ्यांना तत्काळ टेम्पोतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. सुदैवाने वाहनाचा वेग कमी होता.- चाँद शेख, हॉटेल चालक

महिनाभरात सहा अपघातरत्नागिरी-नागपूर महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. महिनाभरात सहा अपघात घडले असून, त्यात सहा जण जागीच ठार झाले तर ४२ जण जखमी झाले आहेत.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघात