शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

शिक्षकच साहित्य आणि संस्कृतीचा खरा आधार आहे : इंद्रजीत भालेराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 13:52 IST

संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव यांचे मत

ठळक मुद्देलातूर येथे शिक्षक साहित्य संमेलन 

लातूर : साहित्य आणि संस्कृती विकसित करण्याच्या कामी शिक्षक आघाडीवर राहिलेले आहेत़ आजवर झालेली साहित्य संमेलने शिक्षकांच्या सहकार्यामुळेच झाली आहेत़ शिक्षक आणि साहित्याचे नाते जवळचे आहे़ शिवाय, अव्वल दर्जाच्या प्रमुख लेखकांमध्येही शिक्षक जास्त आहेत. त्यामुळे शिक्षकच साहित्याचा खरा आधार आहे, असे प्रतिपादन शिक्षक साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव यांनी येथे सोमवारी केले़

महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसच्या सातव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते लातूर येथील गिरवलकर सभागृहात बोलत होते़ मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, स्वागताध्यक्ष आ़ धीरज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, प्रा़ बी़व्ही़ मोतीपवळे, प्राचार्य डॉ़ नागोराव कुंभार, निवृत्त सनदी अधिकारी भा़ई़ नगराळे, महाराष्ट्र शिक्षक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कालिदास माने, शिवाजी साखरे आदींची प्रमुख उपस्थिती होती़

इंद्रजीत भालेराव यांनी ‘काट्या कुट्याचा तुडवित रस्ता, गावाकडे चल माझ्या दोस्ता़’, तसेच ‘शिक बाबा शिक आता लढायला शिक़़़’ या दोन कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली़ यावेळी शैक्षणिक व साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना विलासराव देशमुख ज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ 

टॅग्स :Teacherशिक्षकliteratureसाहित्यlaturलातूर