शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

भाड्याच्या इमारतीतील तालुका कृषी कार्यालय समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST

अहमदपूर : तालुक्याचे ठिकाण असलेल्या अहमदपूर येथील काही कार्यालये आजही भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. त्यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांसह विविध कामानिमित्त ...

अहमदपूर : तालुक्याचे ठिकाण असलेल्या अहमदपूर येथील काही कार्यालये आजही भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. त्यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांसह विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, येथील तालुका कृषी कार्यालय विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.

अहमदपूर तालुक्यात एकूण १२४ गावे, वाड्या, तांडे आहेत. शासनाच्या कृषिसंदर्भातील योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका कृषी कार्यालय दुवा म्हणून काम करीत आहे. मात्र, येथील तालुका कृषी कार्यालयासाठी अद्यापही हक्काची इमारत नाही. त्यामुळे भाड्याच्या छोट्याशा जागेत कार्यालय आहे. विशेष म्हणजे, तालुका कृषी कार्यालयासह रजिस्ट्री कार्यालय, दुय्यम निबंधक, कृषी विभागाचे मंडळ कार्यालय, वनीकरण कार्यालयासाठी स्वतंत्र इमारती नाहीत. ही सर्व कार्यालये भाड्याच्या इमारतीत आहेत.

वनीकरणचे कार्यालय हे शहरातील गायकवाड कॉलनीतील एका भाड्याच्या घरात आहे. तिथे काही काम असल्यास नागरिकांना कार्यालयाचा शोध घ्यावा लागत आहे, तसेच तालुका कृषी कार्यालयही पूर्वी शिक्षक कॉलनीतील भाड्याच्या घरात होते; पण जागा अपुरी पडत असल्याने हे कार्यालय दुसरीकडे हलविण्यात आले. सध्या हे कार्यालय नांदेड रोडवरील भाड्याच्या इमारतीत आहे.

येथील कृषी कार्यालयाला हक्काची जागा नसल्याने छोट्याशा खोलीतून कारभार चालवावा लागत आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

अहमदपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची नेहमीच कृषी कार्यालयात गर्दी असते. त्यामुळे बहुतांश वेळा शेतकऱ्यांना रस्त्यावर थांबावे लागत आहे. कृषी कार्यालयास अपुरी जागा असल्यामुळे ही समस्या आहे, तसेच वाहनतळाची व्यवस्था नसल्याने वाहतुकीस अडथळा होतो. वाहने मुख्य रस्त्यावर उभी करावी लागत आहेत. याशिवाय, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू...

संबंधित विभागाकडे शासकीय जागेत अथवा प्रशासकीय इमारतीत कृषी कार्यालयाला जागा मिळावी म्हणून पाठपुरावा करण्यात येणार आहे. प्रशासकीय इमारतीत कृषी कार्यालयासाठी जागा मिळाली, तर शासनाचे भाडे वाचणार आहे आणि शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे.

-संजय नाबदे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी

तहसील परिसरात जागा द्यावी...

तहसील कार्यालयाच्या परिसरात कृषी कार्यालयाला जागा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची सोय होईल. तहसील कार्यालयाच्या परिसरात सध्या जागा आहे. त्या रिकाम्या जागेचा वापर शासनाने इतर कार्यालयांसाठी केला, तर ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना सोयीचे होईल, असे शिवकुमार उटगे म्हणाले.