शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे पालकांचे छत्र गमावलेल्या मुलांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST

चापोली : कोविडमुळे अनेजण दगावले आहेत. यात अल्पवयीन मुलांचे आई अथवा वडील आणि काहींनी आई- वडील असे पालकांचे छत्र ...

चापोली : कोविडमुळे अनेजण दगावले आहेत. यात अल्पवयीन मुलांचे आई अथवा वडील आणि काहींनी आई- वडील असे पालकांचे छत्र गमावले आहे. या बालकांचे पालकत्व राज्याचा महिला व बालकल्याण विभाग घेणार आहे. चाकूर तालुक्यात अशा १८ बालकांची नोंद झाली असून, सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

बालकांना पालकांच्या आधाराची गरज असते. कोरोनामुळे उपचार घेताना काही बालकांची आई अथवा वडिलांचा मृत्यू झाला. तसेच आई आणि वडील अशा दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या बालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परस्थितीत मुलांचे शिक्षण, आरोग्य, उदरनिर्वाहासाठी शासन त्यांचे पालकत्व घेऊन आवश्यक ती मदत करणार आहे. कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना शासन योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांचा शोध आरोग्य विभाग व तालुकास्तरीय यंत्रणेमार्फत घेतला जात आहे.

बाल संगोपन योजनेंतर्गत कोणत्याही कारणाने आई अथवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना आता दरमहा ११०० रुपयांची मदत केली जाणार आहे. आतापर्यंत ही मदत ४२५ रुपये अशी होती. मात्र, शासनाने त्या रकमेत वाढ केली आहे. दुर्धर आजार अथवा कैदी, विधवा महिलांच्या १८ वर्षांखालील मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.

आई अथवा वडील गमावलेल्या मुलांचा सांभाळ करण्यास इतर नातेवाईक तयार असतील तर त्यांच्या रेशनसाठी विशिष्ट रक्कम दिली जाणार आहे. तसेच पालक नसल्यास त्यांची बालगृहात व्यवस्था केली जाणार आहे. ० ते ६ वयोगटातील अनाथ बालकांना शिशुगृहात ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर अनेकदा मालमत्तेचे वाद निर्माण होतात. या वादांचे निराकरण करण्याचे कामही या विभागाकडून होणार आहे.

कोरोनामुळे काही मुलांचे मायेचे छत्र हरवले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर कृती दल गठित करण्यात आले आहे. अध्यक्षपद हे जिल्हाधिकाऱ्यांकडे असून सदस्य म्हणून बालविकास अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे कृती दल दर १५ दिवसांनी बैठक घेऊन मुलांच्या संगोपनासाठी केलेल्या कामाचा आढावा घेणार आहे.

संख्या वाढण्याची शक्यता...

कोरोनाने मृत्यू होणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार अशा मुलांचा शोध घेतला जात आहे. जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत अशा कुटुंबांचा सर्व्हे केला जात आहे. त्यामुळे संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे चाकूरच्या महिला व बाल प्रकल्पाच्या विस्तार अधिकारी अर्चना कलशेट्टी यांनी सांगितले.