शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

कोरोनामुळे पालकांचे छत्र गमावलेल्या मुलांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST

चापोली : कोविडमुळे अनेजण दगावले आहेत. यात अल्पवयीन मुलांचे आई अथवा वडील आणि काहींनी आई- वडील असे पालकांचे छत्र ...

चापोली : कोविडमुळे अनेजण दगावले आहेत. यात अल्पवयीन मुलांचे आई अथवा वडील आणि काहींनी आई- वडील असे पालकांचे छत्र गमावले आहे. या बालकांचे पालकत्व राज्याचा महिला व बालकल्याण विभाग घेणार आहे. चाकूर तालुक्यात अशा १८ बालकांची नोंद झाली असून, सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

बालकांना पालकांच्या आधाराची गरज असते. कोरोनामुळे उपचार घेताना काही बालकांची आई अथवा वडिलांचा मृत्यू झाला. तसेच आई आणि वडील अशा दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या बालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परस्थितीत मुलांचे शिक्षण, आरोग्य, उदरनिर्वाहासाठी शासन त्यांचे पालकत्व घेऊन आवश्यक ती मदत करणार आहे. कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना शासन योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांचा शोध आरोग्य विभाग व तालुकास्तरीय यंत्रणेमार्फत घेतला जात आहे.

बाल संगोपन योजनेंतर्गत कोणत्याही कारणाने आई अथवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना आता दरमहा ११०० रुपयांची मदत केली जाणार आहे. आतापर्यंत ही मदत ४२५ रुपये अशी होती. मात्र, शासनाने त्या रकमेत वाढ केली आहे. दुर्धर आजार अथवा कैदी, विधवा महिलांच्या १८ वर्षांखालील मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.

आई अथवा वडील गमावलेल्या मुलांचा सांभाळ करण्यास इतर नातेवाईक तयार असतील तर त्यांच्या रेशनसाठी विशिष्ट रक्कम दिली जाणार आहे. तसेच पालक नसल्यास त्यांची बालगृहात व्यवस्था केली जाणार आहे. ० ते ६ वयोगटातील अनाथ बालकांना शिशुगृहात ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर अनेकदा मालमत्तेचे वाद निर्माण होतात. या वादांचे निराकरण करण्याचे कामही या विभागाकडून होणार आहे.

कोरोनामुळे काही मुलांचे मायेचे छत्र हरवले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर कृती दल गठित करण्यात आले आहे. अध्यक्षपद हे जिल्हाधिकाऱ्यांकडे असून सदस्य म्हणून बालविकास अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे कृती दल दर १५ दिवसांनी बैठक घेऊन मुलांच्या संगोपनासाठी केलेल्या कामाचा आढावा घेणार आहे.

संख्या वाढण्याची शक्यता...

कोरोनाने मृत्यू होणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार अशा मुलांचा शोध घेतला जात आहे. जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत अशा कुटुंबांचा सर्व्हे केला जात आहे. त्यामुळे संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे चाकूरच्या महिला व बाल प्रकल्पाच्या विस्तार अधिकारी अर्चना कलशेट्टी यांनी सांगितले.