शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

विहिर आटली, भाजीपाला सुकला; कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By राजकुमार जोंधळे | Updated: April 7, 2024 00:01 IST

लातूर जिल्हा : विहिरीत उडी घेत संपविले जीवन

औराद शहाजानी (जि. लातूर) : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील विहिर आटली अन् भाजीपाला सुकला. यातून रब्बी पिकासह भाजीपाज्याचे मोठे नुकसान झाले. यातून आता कर्जाची परतफेड कशी करावी? या विवंचनेत असलेल्या एका तरुण शेतकऱ्याने सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बाेटकुळ (ता. निलंगा) येथे घडली. 

पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील बोटकुळ येथील ज्ञानेश्वर राम मोरे (वय २३) यांचा उदनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. ते आपल्या वडिलोपार्जित शेतीत भाजीपालासह इतर पिकांचे उत्पादन घेतात. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी चार एकरावर लातूर जिल्हा बँकेचे कर्ज शेतीसाठी घेतले होते. शेतात त्यांनी पारंपरिक शेतीबराेबरच विविध प्रयोग करून भाजीपाला उत्पादन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे त्यांचे माेठे नुकसान झाले. लागवड खर्चही पदरी न पडल्याने मोठे नुकसान झाले. यंदा परतीचा पाऊस न पडल्याने शेतातील विहीर उन्हाळ्यापूर्वीच आटली. त्याचबराेबर डाेक्यावर शासकीय कर्जासह खाजगी व्यक्तीकडून घेतलेल्या कर्जाचे ओझे वाढले. आता अशा स्थितीत कर्जाची परतफेड कशी करायची? या विवंचनेत असलेले ज्ञानेश्वर माेरे हे गुरुवारी पहाटे घरातून निघून गेले. 

शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत आढळला. निलंगा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. याबाबत औराद शहाजानी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पाे.हे.काॅ. धनराज हारणे करीत आहेत.