शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विहिर आटली, भाजीपाला सुकला; कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By राजकुमार जोंधळे | Updated: April 7, 2024 00:01 IST

लातूर जिल्हा : विहिरीत उडी घेत संपविले जीवन

औराद शहाजानी (जि. लातूर) : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील विहिर आटली अन् भाजीपाला सुकला. यातून रब्बी पिकासह भाजीपाज्याचे मोठे नुकसान झाले. यातून आता कर्जाची परतफेड कशी करावी? या विवंचनेत असलेल्या एका तरुण शेतकऱ्याने सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बाेटकुळ (ता. निलंगा) येथे घडली. 

पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील बोटकुळ येथील ज्ञानेश्वर राम मोरे (वय २३) यांचा उदनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. ते आपल्या वडिलोपार्जित शेतीत भाजीपालासह इतर पिकांचे उत्पादन घेतात. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी चार एकरावर लातूर जिल्हा बँकेचे कर्ज शेतीसाठी घेतले होते. शेतात त्यांनी पारंपरिक शेतीबराेबरच विविध प्रयोग करून भाजीपाला उत्पादन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे त्यांचे माेठे नुकसान झाले. लागवड खर्चही पदरी न पडल्याने मोठे नुकसान झाले. यंदा परतीचा पाऊस न पडल्याने शेतातील विहीर उन्हाळ्यापूर्वीच आटली. त्याचबराेबर डाेक्यावर शासकीय कर्जासह खाजगी व्यक्तीकडून घेतलेल्या कर्जाचे ओझे वाढले. आता अशा स्थितीत कर्जाची परतफेड कशी करायची? या विवंचनेत असलेले ज्ञानेश्वर माेरे हे गुरुवारी पहाटे घरातून निघून गेले. 

शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत आढळला. निलंगा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. याबाबत औराद शहाजानी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पाे.हे.काॅ. धनराज हारणे करीत आहेत.