शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थी अन् गुरुजीही गहिवरले! पुष्पवृष्टी करीत ग्रामस्थांकडून निरोप

By हरी मोकाशे | Updated: June 12, 2023 13:05 IST

डोंगराळ भागात असलेल्या या तांड्यावरील पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत या दोन्ही शिक्षकांनी शाळेची पटसंख्या वाढविली.

जळकोट : तांड्यावरील मुलांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण करुन आकाशाला गवसणी घालणारे स्वप्न साकार करण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणाऱ्या भवानीनगर तांडा (ता. जळकोट) येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांची प्रशासकीय बदली झाली. या बदलीमुळे शिक्षकच नव्हे तर विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही गहिवरले. पुष्पवृष्टी करीत विद्यार्थी व पालकांनी या दोन्ही शिक्षकांना निरोप दिला.

जळकोट तालुक्यातील सुल्लाळी ग्रामपंचायतीअंतर्गत भवानीनगर तांडा आहे. येथे १७ जून २०१० रोजी जिल्हा परिषद शाळा सुरु करण्यात आली. या शाळेवर सहशिक्षक म्हणून जिल्हा बदलीने नरसिंग सुरेकर व बालाजी वाड हे आले. डोंगराळ भागात असलेल्या या तांड्यावरील पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत या दोन्ही शिक्षकांनी शाळेची पटसंख्या वाढविली.

एका छोट्याशा खोलीत भरणाऱ्या शाळेसाठी टुमदार इमारत लोकवर्गणीतून उभारली. तसेच शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेकडे येण्याचा ओढा वाढला. शिवाय, पालकांनाही आपली मुले शिकू लागली आहेत, याचा मोठा आनंद झाला. तांड्यावरील मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन स्पर्धा परीक्षेची तयारीही करुन घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुलांची गुणवत्ता वाढली.

या शिक्षकांनी आत्मियतने आणि तन्मयतेने अध्यापनाचे कार्य केल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये आपुलकी निर्माण होऊन जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते. दरम्यान, या दोन्ही शिक्षकांची प्रशासकीय बदली झाल्याचे समजताच मुलांसह पालकांना धक्का बसला.

सहशिक्षक नरसिंग सुरेकर व बालाजी वाड हे आता कार्यमुक्त होणार असल्याने रविवारी गावकऱ्यांनी या दोन्ही शिक्षकांची गावातून मिरवणूक काढली. विद्यार्थ्यांनी फुलांच्या पायघड्या घालून पुष्पवृटी करीत डोळ्यांतून अश्रू वाहत मोठ्या जड अंत:करणाने निरोप दिला. यावेळी शिक्षकांच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहत होते. यावेळी गणेश राठोड, विश्वनाथ राठोड, सुभाष राठोड, वसंत राठोड, विजय राठोड, शिवाजी राठोड, रमेश राठोड, राहुल राठोड, राजाराम मामा राठोड, सोपान राठोड, किशन राठोड आदींची उपस्थिती होती.

आमचे लाडके गुरुजी चालले...शाळेतील सर्व मुलांना सहशिक्षक नरसिंग सुरेकर व बालाजी वाड यांच्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला होता. रविवारी निरोप समारंभानंतर मुले आमचे लाडके गुरुजी चालले, असे डोळ्यांतून अश्रू वाहत सांगत होते. काही मुले तर गुुरुजी तुम्ही येथून जाऊ नका, अशी विनवणी करीत होते. त्यामुळे गुरुजीही गहिवरले होते.

टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळाlaturलातूर