शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पहिल्याच पावसात लातूर शहरात तारांबळ; माजी पदाधिकारी, नगरसेवकांना देणे-घेणे नाही का ?

By हणमंत गायकवाड | Updated: June 6, 2024 18:47 IST

मान्सूनपूर्व कामे झाली, असा दावा प्रशासनाने केला. काही ठिकाणची कामेही दाखविली; परंतु गुरुवारी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात रस्त्यांवर घाण पसरली.

लातूर : मनपात सध्या प्रशासकराज आहे. पदाधिकारी, नगरसेवक माजी झाले आहेत. त्यामुळे शहराच्या प्रश्नाचे कोणाला देणे-घेणे उरलेले नाही. पहिल्याच पावसात शहरवासीयांची तारांबळ उडाली. तुंबलेल्या गटारी रस्त्यावर उलटल्या. सगळी घाण लोकांच्या दारात आणि काहींच्या घरातही गेली. जणू पुढे महापालिकेची निवडणूकच होणार नाही आणि त्या माजी नगरसेवकांना वा इच्छुकांना निवडणूकच लढवायची नाही, अशा समजुतीत सगळे घरात आहेत.

मान्सूनपूर्व कामे झाली, असा दावा प्रशासनाने केला. काही ठिकाणची कामेही दाखविली; परंतु गुरुवारी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात रस्त्यांवर घाण पसरली. जागोजागी पाणी तुंबले. मुख्य रस्ते, भुयारी मार्ग इतकेच नव्हे तर रिंग रोडवरसुद्धा पाणीच पाणी होते. कदाचित पुढच्या काही तासांत त्याचा निचरा होईल; परंतु अनेकांच्या दारात पोहोचलेली घाण आणि दुर्गंधी काही दिवस तरी त्रासदायक ठरणार आहे.

कुठे गेले माजी बहाद्दर..!प्रत्येक सोहळ्यांमध्ये मिरवायचे, सोशल मीडियात चमकवायचे हे बरे सुचते. मनपाचा विषय आला की आता प्रशासकराज म्हणून मोकळे. आमचे कोणी ऐकत नाही, हे सांगून नामानिराळे. अर्थात याला काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, सेना कोणीच अपवाद नाही. कोणी ऐकत नसेल तर ठिय्या मांडा. प्रशासनाच्या दारात बसा, अधिकाऱ्यांना जागचे उठू देऊ नका. जे खुर्चीवरच बसत नाहीत, त्या रिकाम्या खुर्च्यांना मैदानात आणा, अशा तीव्र भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. प्रशासनाची जबाबदारी आहेच; परंतु ज्यांना लोकांची मते मागायला दारात जायचे आहे, त्यांनी निदान झालेल्या विपरीत अवस्थेचा आढावा घेऊन संबंधितांना धारेवर धरावे, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.

संघटना गेल्या कुठे?माहिती अधिकाराचा अर्ज टाकणे आणि मिळालेल्या माहितीच्या कुरणावर दिवस काढणाऱ्यांबद्दल बोलणार नाही; परंतु जनहिताचा टेंभा मिरविणाऱ्या संघटना तरी जाग्या होणार आहेत की नाही, असा सवाल नागरिक व्यक्त करीत आहेत.

काय आहेत प्रश्न...कंत्राटाचा वाद-विवाद जे काही आहे ते लवकर संपवा. शहरातील अस्वच्छता दूर करा. हे शहर कधी काळी स्वच्छ होते, अशी आजची स्थिती आहे. स्वच्छतेचा पुरस्कार आणि गौरव झालेली महापालिका आहे, याची आठवण पुन्हा करून द्या.कचरा जागोजागी जाळला जातो. हजार तक्रारी केल्या असतील. छायाचित्रे, व्हिडीओ माध्यमातून फिरत असतात. कोणीच दखल घेत नाही. किमान अज्ञाताविरुद्ध तरी गुन्हे दाखल करा.नाल्या तुडुंब भरल्या आहेत. काही बहाद्दर नागरिक दुसऱ्याच्या दारातील घाण आपल्याकडे नको म्हणून जाळ्या ठोकून नाल्या अडवितात. तक्रारी करूनही कारवाई होत नाही.मुख्य रस्त्यांवर खड्डेच खड्डे, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी अनेक ठिकाणी खड्डे आहेत.राजस्थान विद्यालय ते बार्शी रोडवरील रेल्वे उड्डाण पुलापर्यंत असणाऱ्या समांतर रस्त्यांवर खड्डे, अस्वच्छता, कचरा आणि अवैध पार्किंग असते. तो रस्ता एक वाहन जाण्यापुरता तरी मोकळा होणार आहे की नाही.छत्रपती चौक ते पीव्हीआर सिनेमागृहापर्यंत येणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी कचरा डेपो झालेला आहे.अंतर्गत रस्त्यांवर बांधकाम साहित्य, खड्डे आणि अस्वच्छतेचे थैमान आहे.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिकाRainपाऊस