शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

वृक्षांचे नुकसान केल्याच्या निषेधार्थ कपडे काढून आंदाेलन

By राजकुमार जोंधळे | Updated: December 6, 2022 18:29 IST

ग्रीन लातूर वृक्ष टीमचा संताप, दररोज घेतली जातेय वृक्षांची अग्निपरीक्षा

लातूर : येथील ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने गेल्या १ हजार २८५ दिवसांपासून अखंडित वृक्षलागवड, संवर्धनाचे काम सुरू आहे. या माध्यमातून लातूर शहरात माेठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. या लावलेल्या वृक्षांचे संवर्धनाचे कार्य नियमितपणे सुरू आहे. लातूर शहराचे हरित आच्छादन वाढले आहे, शहर हिरवेगार दिसत आहे. काही लोकांकडून सातत्याने झाडांची नासधूस सुरू आहे, झाडे तोडणे, झाडांखाली हेतुपूर्वक कचरा पेटवून देणे, विनाकारण झाडांच्या फांद्या तोडणे आणि हा प्रकार सातत्याने वाढत आहे.

दोन दिवसांपूर्वी विलासराव देशमुख मार्गावरील सात झाडांखाली मुद्दामहून कचरा पेटवून दिला, ज्यामुळे ती झाडे जळून जावीत. सात मोठी झाडे जळून गेली. काल उद्योग भवन परिसरात मोठ्या पिंपळाच्या वृक्षाखाली कचरा पेटवून देण्यात आला. यामुळे ते झाड जळाले आहे. वृक्षतोड, झाडांखाली कचरा जाळून झाडांना हानी पोहोचविणे या बाबी सतत महानगरपालिका आयुक्त, उपायुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. तर विभागीय आयुक्त औरंगाबाद येथे तक्रार करूनही संबंधिताकडून दखल घेतली जात नव्हती.

यामुळे ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी जाळलेल्या झाडासमोर कपडे काढून (अर्धनग्न) निषेध व्यक्त करण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने लातूर शहरात वृक्ष समिती, वृक्ष प्राधिकरण स्थापन करावे, त्यांच्या बैठका घ्याव्यात, उद्यान कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, झाडे तोडणाऱ्या आणि झाडे जाळणाऱ्या संबंधित लोकांवर कारवाई करावी. अशी मागणी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, डॉ. भास्करराव बोरगावकर, पदमाकर बागल, सुलेखा कारेपूरकर, आकाश सावंत, मनीषा कोकणे, नागसेन कांबळे, अविनाश मंत्री, सीताराम कंजे आदींनी केली आहे.

टॅग्स :laturलातूरenvironmentपर्यावरण