शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

लातूर जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी ३५३९ पशुधनाचे वंधत्व निवारण

By हरी मोकाशे | Updated: December 7, 2023 18:57 IST

लातूर जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशुधनाची एकूण संख्या ५ लाख १३ हजार आहे.

लातूर : दूध उत्पादन वाढविण्यासाठी तसेच भाकड जनावरांची संख्या कमी करण्यासाठी राज्यात वंधत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २६० गावांत शिबीरे घेण्यात आली. त्यात ३ हजार ५३९ पशुधनांवर वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशुधनाची एकूण संख्या ५ लाख १३ हजार आहे. त्यात प्रजननक्षम पशुधनाची संख्या २ लाख ४१ हजार ४८ अशी आहे. दरम्यान, सन २०२१- २२ मधील आकडेवारीनुसार दररोजची प्रति व्यक्तीसाठीची राज्यातील दूध उपलब्धता ही ३१५ ग्रॅम आहे. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत राज्यातील प्रति दिन प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता ही १२९ ग्रॅमने कमी आहे. तसेच भाकड जनावरांची संख्याही अधिक आहे. दुधाळ जनावरे भाकड राहण्याचे प्रमुख कारणे म्हणजे त्यांच्यातील वंध्यत्व होय. राज्यातील दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गायी- म्हशींची प्रजनन क्षमता वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे.

अभियानाअंतर्गत तपासणी, उपचारराज्यव्यापी वंधत्व निवारण अभियानअंतर्गत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक पशुधन तपासणी व उपचार शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत २६० गावांमध्ये शिबीर घेण्यात आले आहेत. त्यात ३ हजार ५३९ भाकड जनावरांची तपासणी करण्यात येऊन वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात आले आहेत. उर्वरित गावांत येत्या १९ डिसेंबरपर्यंत शिबीर घेण्यात येणार आहेत.

अडीच लाख जनावरे प्रजननक्षमजिल्ह्यात गाय आणि म्हैसवर्गीय पशुधन संख्या ५ लाख १३ हजार असली तरी सध्या त्यातील २ लाख ४१ हजार ४८ जनावरे प्रजननक्षम आहेत. सध्याचा कालावधी हा पशुधन गाभण राहण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिबिरादरम्यान, भाकड जनावरांची तपासणी करुन तात्काळ उपचार करण्यात येत आहेत. त्यासाठी अभियानपूर्वी गावोगावी बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली आहे.

२१ दिवसानंतर पुन्हा तपासणी...शिबिरादरम्यान पशुधनावर वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात येत आहेत. त्यानंतर पुन्हा २१ दिवसांनी या जनावरांची तपासणी करण्यात येणार आहे. तेव्हा सदरील पशुधन गाभण राहिले की नाही, हे पाहून आणखीन उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी आणि भाकड जनावरांची संख्या कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी