शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी ३५३९ पशुधनाचे वंधत्व निवारण

By हरी मोकाशे | Updated: December 7, 2023 18:57 IST

लातूर जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशुधनाची एकूण संख्या ५ लाख १३ हजार आहे.

लातूर : दूध उत्पादन वाढविण्यासाठी तसेच भाकड जनावरांची संख्या कमी करण्यासाठी राज्यात वंधत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २६० गावांत शिबीरे घेण्यात आली. त्यात ३ हजार ५३९ पशुधनांवर वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशुधनाची एकूण संख्या ५ लाख १३ हजार आहे. त्यात प्रजननक्षम पशुधनाची संख्या २ लाख ४१ हजार ४८ अशी आहे. दरम्यान, सन २०२१- २२ मधील आकडेवारीनुसार दररोजची प्रति व्यक्तीसाठीची राज्यातील दूध उपलब्धता ही ३१५ ग्रॅम आहे. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत राज्यातील प्रति दिन प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता ही १२९ ग्रॅमने कमी आहे. तसेच भाकड जनावरांची संख्याही अधिक आहे. दुधाळ जनावरे भाकड राहण्याचे प्रमुख कारणे म्हणजे त्यांच्यातील वंध्यत्व होय. राज्यातील दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गायी- म्हशींची प्रजनन क्षमता वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे.

अभियानाअंतर्गत तपासणी, उपचारराज्यव्यापी वंधत्व निवारण अभियानअंतर्गत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक पशुधन तपासणी व उपचार शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत २६० गावांमध्ये शिबीर घेण्यात आले आहेत. त्यात ३ हजार ५३९ भाकड जनावरांची तपासणी करण्यात येऊन वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात आले आहेत. उर्वरित गावांत येत्या १९ डिसेंबरपर्यंत शिबीर घेण्यात येणार आहेत.

अडीच लाख जनावरे प्रजननक्षमजिल्ह्यात गाय आणि म्हैसवर्गीय पशुधन संख्या ५ लाख १३ हजार असली तरी सध्या त्यातील २ लाख ४१ हजार ४८ जनावरे प्रजननक्षम आहेत. सध्याचा कालावधी हा पशुधन गाभण राहण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिबिरादरम्यान, भाकड जनावरांची तपासणी करुन तात्काळ उपचार करण्यात येत आहेत. त्यासाठी अभियानपूर्वी गावोगावी बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली आहे.

२१ दिवसानंतर पुन्हा तपासणी...शिबिरादरम्यान पशुधनावर वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात येत आहेत. त्यानंतर पुन्हा २१ दिवसांनी या जनावरांची तपासणी करण्यात येणार आहे. तेव्हा सदरील पशुधन गाभण राहिले की नाही, हे पाहून आणखीन उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी आणि भाकड जनावरांची संख्या कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी