शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

दिल्या घरी 'होम क्वारंटाईन' राहा; नवरदेव संस्थात्मक, तर नवरी सासरी क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 13:15 IST

लग्न जरी झाले असले तरी अजून काही दिवस या जोडप्याला ‘कैसी ये जुदाई’ म्हणत दिवस कंठावे लागणार आहेत.

ठळक मुद्देक्वारंटाईन १४ दिवसांचा असल्यामुळे नवविवाहित जोडप्यांना आता दोन आठवड्यानंतरच भेटता येणार लातूररोड येथील एका परिवाराला क्वारंटाईन व्हावे लागले

- संदीप अंकलकोटे  

चाकूर (जि. लातूर) : रीतीरिवाजाप्रमाणे परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे मुलीच्या दारी विवाह सोहळा झाला. तद्नंतर लातूरला सासरी निघालेल्या मुलीला दिल्या घरी सुखी राहा, असा आशीर्वाद माहेरच्यांनी दिला असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिल्या घरी होम क्वारंटाईन राहा असा सल्ला दिला. परिणामी, नवरदेव संस्थात्मक क्वारंटाईन तर नवरीला सासरी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे लग्न जरी झाले असले तरी अजून काही दिवस या जोडप्याला ‘कैसी ये जुदाई’ म्हणत दिवस कंठावे लागणार आहेत.

क्वारंटाईन १४ दिवसांचा असल्यामुळे नवविवाहित जोडप्यांना आता दोन आठवड्यानंतरच भेटता येणार आहे. गुरुवारी या दोघांसह विवाहाला उपस्थित राहिलेल्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्येत ठणठणीत असली वा कोणतीही लक्षणे नसली तरी परजिल्ह्यातून आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन करण्याचे निर्देश आहेत. त्याआधारे पूर्णा येथे ६ मे रोजीच्या विवाह सोहळ्याला गेलेल्या लातूररोड येथील एका परिवाराला क्वारंटाईन व्हावे लागले असून, संबंधित परिवारानेही उत्स्फूर्तपणे प्रशासनाला सहकार्य केले आहे. 

पोलीस निरीक्षक जयवंतराव चव्हाण, पोहेकॉ. प्रभाकरराव अंधोरीकर, ग्रामपंचायतीचे कर्मचारी शंकर साबणे यांनी सदरील माहिती दिली. विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या ७ पुरुषांना संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे. तर नवरी व सासूला घरी होम क्वारंटाईन केले आहे. दरम्यान, उदगीर तालुक्यातून आलेल्या एक महिला व एका बालकास लातूर रोड येथे आल्यानंतर वैद्यकीय तपासणी करून क्वारंटाईन केले आहे.

विवाह सोहळ्यासाठी दोन वाहनेविवाह सोहळ्यासाठी दोन वाहने गेली होती. लातूर रोड ते पूर्णा व पूर्णा ते लातूर रोड असा प्रवास त्यांनी केला. संचारबंदीच्या काळातील हा प्रवास अचंबित करणारा आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न