शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

दिल्या घरी 'होम क्वारंटाईन' राहा; नवरदेव संस्थात्मक, तर नवरी सासरी क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 13:15 IST

लग्न जरी झाले असले तरी अजून काही दिवस या जोडप्याला ‘कैसी ये जुदाई’ म्हणत दिवस कंठावे लागणार आहेत.

ठळक मुद्देक्वारंटाईन १४ दिवसांचा असल्यामुळे नवविवाहित जोडप्यांना आता दोन आठवड्यानंतरच भेटता येणार लातूररोड येथील एका परिवाराला क्वारंटाईन व्हावे लागले

- संदीप अंकलकोटे  

चाकूर (जि. लातूर) : रीतीरिवाजाप्रमाणे परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे मुलीच्या दारी विवाह सोहळा झाला. तद्नंतर लातूरला सासरी निघालेल्या मुलीला दिल्या घरी सुखी राहा, असा आशीर्वाद माहेरच्यांनी दिला असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिल्या घरी होम क्वारंटाईन राहा असा सल्ला दिला. परिणामी, नवरदेव संस्थात्मक क्वारंटाईन तर नवरीला सासरी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे लग्न जरी झाले असले तरी अजून काही दिवस या जोडप्याला ‘कैसी ये जुदाई’ म्हणत दिवस कंठावे लागणार आहेत.

क्वारंटाईन १४ दिवसांचा असल्यामुळे नवविवाहित जोडप्यांना आता दोन आठवड्यानंतरच भेटता येणार आहे. गुरुवारी या दोघांसह विवाहाला उपस्थित राहिलेल्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्येत ठणठणीत असली वा कोणतीही लक्षणे नसली तरी परजिल्ह्यातून आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन करण्याचे निर्देश आहेत. त्याआधारे पूर्णा येथे ६ मे रोजीच्या विवाह सोहळ्याला गेलेल्या लातूररोड येथील एका परिवाराला क्वारंटाईन व्हावे लागले असून, संबंधित परिवारानेही उत्स्फूर्तपणे प्रशासनाला सहकार्य केले आहे. 

पोलीस निरीक्षक जयवंतराव चव्हाण, पोहेकॉ. प्रभाकरराव अंधोरीकर, ग्रामपंचायतीचे कर्मचारी शंकर साबणे यांनी सदरील माहिती दिली. विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या ७ पुरुषांना संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे. तर नवरी व सासूला घरी होम क्वारंटाईन केले आहे. दरम्यान, उदगीर तालुक्यातून आलेल्या एक महिला व एका बालकास लातूर रोड येथे आल्यानंतर वैद्यकीय तपासणी करून क्वारंटाईन केले आहे.

विवाह सोहळ्यासाठी दोन वाहनेविवाह सोहळ्यासाठी दोन वाहने गेली होती. लातूर रोड ते पूर्णा व पूर्णा ते लातूर रोड असा प्रवास त्यांनी केला. संचारबंदीच्या काळातील हा प्रवास अचंबित करणारा आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न