शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

बाजारात सोयाबीन गडगडले; तुरीच्या दरात उसळी !

By संदीप शिंदे | Updated: January 24, 2024 17:25 IST

सौदा न निघताच उदगीरच्या बाजारात शेतमालाची खरेदी

उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी सोयाबीनचा दर शासनाने घोषित केलेल्या ४ हजार ६०० रुपये क्विंटलच्या हमीदरापर्यंत खाली घसरला आहे. पुढील काळात हे दर आणखी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर तूरीच्या दारात ५०० रुपयांनी वाढ झाली असून, बुधवारी उदगीर मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांनी सौदा न काढताच शेतमालाची खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली.

सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत आहे. मागील आठवड्यात ४ हजार ६५० रुपये असलेला दर या आठवड्यात ५० रुपयांनी घसरून ४ हजार ६०० पर्यंत खाली आला. खाद्य तेलाचे दर घसरत असल्याने व सोयाबीन पेंडीला मागणी नसल्यामुळे सोयाबीनचे दर भविष्यात आणखी कमी होतील अशी शक्यता आहे. तर तुरीच्या डाळीला सध्या मागणी असल्याने तुरीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

मागील आठवड्यात तूर ९ हजार ३०० रुपये क्विंटल दराने विक्री होत होती. परंतू सुरु आठवड्यात तुरीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ होऊन चांगल्या प्रतीच्या तुरीला ९ हजार ८०० रुपयापर्यंत दर मिळाला. उदगीरमध्ये सौद्याच्या वेळी समितीचे प्रभारी सचिव व हमालामध्ये बाचाबाची झाल्यामुळे सौदा निघाला नाही. सुरुवातीला बाजार बंद राहतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू दुपारी व्यापाऱ्यांनी पोटलीचा दर काढून शेतमालाची खरेदी केली. जर सौदा निघाला असता तर बाजारात मोठ्या प्रमाणात आवक असलेल्या तुरीला चांगला दर मिळाला असता अशी भावना शेतकरी व्यक्त करीत होते. पुढील तीन दिवस मार्केट यार्ड श्री गुरु हावगीस्वामी यात्रेनिमित्त बंद राहणार असल्याने व्यापारी मागतील त्या दराने शेतमाल विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली.

तर मिळाला असता १० हजारांचा दर...बाजार समिती व हमालामध्ये झालेला वाद वेळीच मिटवला असता तर सध्या तुरीला दर १० हजारांवर मिळाला असता. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान टळले असते. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याबाबत सर्वांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे आडत असोशिएशनचे अध्यक्ष श्रीधर बिरादार यांनी सांगितले. तर प्र.सचिव प्रदीप पाटील म्हणाले, बाजार समिती व हमालामध्ये आज गैरसमजातून वाद झालेला आहे. सौदा काढून शेतमालाचे वजन माप करून गावाकडे जाण्यास उशीर झाला असता म्हणून सौदा काढला नाही.

सद्यस्थितीत तूर विक्रीसाठी योग्य वेळ...सध्या बाजारात तुरीला दर चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या दरात विक्री करण्यास हरकत नाही. दरवाढीची आशा करून तुरी विक्री विना ठेवल्यास घरी कीड लागणे, वजनात तूट येणे या प्रकारे नुकसान होण्याची शक्यता असते. सध्या मिळणारे दर हे शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहेत. खरीप हंगामात नुकसान झाले आहे. आता तूरीच्या विक्रीतून शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. सोयाबीनचे दर कमीच आहेत. त्यामुळे तूर विक्रीसाठी योग्य वेळ असल्याचे व्यापारी चंद्रकांत बिरादार यांनी सांगितले.

 

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र