शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

सोयाबीन पाण्यात; गंजीतून धुराडा, कणसाला मोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 14:35 IST

एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले.

- एम. जी. मोमीन 

जळकोट (जि़ लातूर) :  तालुक्यात सोयाबीन पाण्यात असून, हायब्रीडच्या कणसाला मोड फुटले आहेत, तर काढणी केलेल्या सोयाबीनच्या गंजीतून धुराडा निघत आहे.

तालुक्यात १७ हजार हेक्टरवरील सोयाबीन, २ हजार हेक्टरवरील खरीप ज्वारी व ११ हजार हेक्टरवरील कापसाचे पीक पाण्यात गेले आहे.  एकंदर तालुक्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.  माळहिप्परगा शिवारात  एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. माळहिप्परग्याचे शेतकरी रामचंद्र केंद्रे सांगत होते, १० एकरपैकी ६ एकरवर सोयाबीन पेरले ते पाण्यात बुडाले आहे. तुकाराम केंद्रे यांच्या शेतातील सोयाबीनही पाण्यात आहे.   मंगरुळच्या ७३० एकरच्या शिवारातही  पाणी असून महेताब बेग यांच्या कापसाच्या पिकाचे बोंड पाण्यात गळून पडले. उद्धव सूर्यवंशी, सोनवळ्याचे विठ्ठल रामकिशन पाटील यांचीही पिके नष्ट झाली आहेत.

थेट मदतीची मागणीहावरगा येथील विनोद कांबळे, शिवाजीनगर तांडा येथील धोंडिराम राठोड, जळकोटचे सुभाष भोसले, सोनवळ्याचे अरविंद नागरगोजे, सेलदरा येथील बापूराव पाटील, वैजनाथ कमलापुरे आदी शेतकऱ्यांनी बाधित पीक दाखवून थेट मदत करण्याची मागणी केली. अशीच विदारक स्थिती कोळनूर, बोरगाव, शेलदरा, रावणकोळा, घोणसी, जळकोट, माळहिप्परगा आदी  शिवारातील पिकांची आहे़

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीlaturलातूरRainपाऊस