शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

सोयाबीन, तुरीच्या दरात घसरण सुरूच; दरवाढीच्या आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

By संदीप शिंदे | Updated: January 5, 2024 18:56 IST

सोयाबीनसारख्या नगदी पिकाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा दर तरी चांगला मिळेल, अशी आशा होती.

उदगीर : येथील मार्केट यार्डमध्ये सोयाबीनची आवक दिवसेंदिवस कमी होत असून, दरही घसरत आहेत. खरिपाचे शेवटचे पीक असलेल्या तुरीच्या दरात कमालीची घसरण झाली असल्याने दरवाढीची आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. त्यातच रब्बीच्या नवीन हरभऱ्याची आवक बाजारात तुरळक प्रमाणात सुरू झाली आहे.

यंदा पावसाच्या लहरीपणाचा फटका खरीप पिकांना बसला. सोयाबीनसारख्या नगदी पिकाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा दर तरी चांगला मिळेल, अशी आशा होती. परंतु, हंगामाच्या सुरुवातीला असलेला ४ हजार ६०० दर मध्यंतरी ५ हजार २५० पर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीची आशा लागली होती. दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी विक्री न करता त्यांचा माल घरी ठेवला होता. परंतु, मागील एक महिन्यापासून सोयाबीनच्या घरात घट होत आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. बाजारात आवक जरी कमी झाली असली तरी दरदेखील कमी होत चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवीन तुरीची आवक बाजारात सुरू झाली. सुरुवातीला दर ९ हजार ८०० ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल होता. मागील वर्षी तुरीला हंगामाच्या शेवटी उच्चांकी १२ हजार क्विंटलचा दर मिळाला होता. परंतु, एक आठवड्यापासून तुरीच्या दरात प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपयांची घट झाली आहे. शुक्रवारी बाजारात चांगल्या प्रतीच्या तुरीला ८ हजार ५०० प्रति क्विंटलचा दर मिळाला. येणाऱ्या काळात तुरीच्या घरात आणखी घट होण्याची शक्यता व्यापारी वर्तवीत आहेत. दरम्यान, रब्बीच्या नवीन हरभऱ्याची आवक बाजारात तुरळक सुरू झाली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना धोका दिल्यामुळे हरभऱ्याचा पेरा मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. त्यातच हवामानामध्ये बदल होत असल्याने हरभऱ्याची पीक हाती किती येईल याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात शंकाच आहे. नवीन हरभरा ५ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला.

थेट खरेदी केंद्रामुळे मोंढ्यात आवक कमी...सोयाबीनचे उत्पादन दर्जेदार झालेले आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांनी ठिकठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले असून, मार्केट यार्डपेक्षा ५० ते ७० रुपयांचा जास्तीचा दर मिळत असल्याने अनेक शेतकरी त्यांचा माल मार्केट यार्डात विकण्यापेक्षा खासगी कंपनीच्या केंद्रावर विकत आहेत. त्यामुळे मार्केट यार्डमध्ये आवक कमी होत आहे. त्वरित वजन, कुठलीही कपात नाही, खात्यात लगेच रक्कम येत असल्याने शेतकऱ्यांचा कल खासगी कंपनीच्या केंद्राकडे वाढला आहे.

आगामी काळात दरवाढीची अपेक्षा कमी...बाहेर देशातून खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात होत असल्यामुळे स्थानिक बाजारातील सोयाबीनच्या खाद्यतेलास तसेच सोयाबीनच्या पेंडीला मागणी कमी झालेली आहे. याचा एकत्रित परिणाम होऊन कारखानदाराकडून सोयाबीनची मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर घसरत आहेत. पुढील काळात निवडणुका असल्यामुळे दरवाढीची शक्यता फारच कमी असल्याचे व्यापारी अमोल राठी यांनी सांगितले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र