शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

सोयाबीन, तुरीच्या दरात घसरण सुरूच; दरवाढीच्या आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

By संदीप शिंदे | Updated: January 5, 2024 18:56 IST

सोयाबीनसारख्या नगदी पिकाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा दर तरी चांगला मिळेल, अशी आशा होती.

उदगीर : येथील मार्केट यार्डमध्ये सोयाबीनची आवक दिवसेंदिवस कमी होत असून, दरही घसरत आहेत. खरिपाचे शेवटचे पीक असलेल्या तुरीच्या दरात कमालीची घसरण झाली असल्याने दरवाढीची आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. त्यातच रब्बीच्या नवीन हरभऱ्याची आवक बाजारात तुरळक प्रमाणात सुरू झाली आहे.

यंदा पावसाच्या लहरीपणाचा फटका खरीप पिकांना बसला. सोयाबीनसारख्या नगदी पिकाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा दर तरी चांगला मिळेल, अशी आशा होती. परंतु, हंगामाच्या सुरुवातीला असलेला ४ हजार ६०० दर मध्यंतरी ५ हजार २५० पर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीची आशा लागली होती. दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी विक्री न करता त्यांचा माल घरी ठेवला होता. परंतु, मागील एक महिन्यापासून सोयाबीनच्या घरात घट होत आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. बाजारात आवक जरी कमी झाली असली तरी दरदेखील कमी होत चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवीन तुरीची आवक बाजारात सुरू झाली. सुरुवातीला दर ९ हजार ८०० ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल होता. मागील वर्षी तुरीला हंगामाच्या शेवटी उच्चांकी १२ हजार क्विंटलचा दर मिळाला होता. परंतु, एक आठवड्यापासून तुरीच्या दरात प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपयांची घट झाली आहे. शुक्रवारी बाजारात चांगल्या प्रतीच्या तुरीला ८ हजार ५०० प्रति क्विंटलचा दर मिळाला. येणाऱ्या काळात तुरीच्या घरात आणखी घट होण्याची शक्यता व्यापारी वर्तवीत आहेत. दरम्यान, रब्बीच्या नवीन हरभऱ्याची आवक बाजारात तुरळक सुरू झाली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना धोका दिल्यामुळे हरभऱ्याचा पेरा मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. त्यातच हवामानामध्ये बदल होत असल्याने हरभऱ्याची पीक हाती किती येईल याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात शंकाच आहे. नवीन हरभरा ५ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला.

थेट खरेदी केंद्रामुळे मोंढ्यात आवक कमी...सोयाबीनचे उत्पादन दर्जेदार झालेले आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांनी ठिकठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले असून, मार्केट यार्डपेक्षा ५० ते ७० रुपयांचा जास्तीचा दर मिळत असल्याने अनेक शेतकरी त्यांचा माल मार्केट यार्डात विकण्यापेक्षा खासगी कंपनीच्या केंद्रावर विकत आहेत. त्यामुळे मार्केट यार्डमध्ये आवक कमी होत आहे. त्वरित वजन, कुठलीही कपात नाही, खात्यात लगेच रक्कम येत असल्याने शेतकऱ्यांचा कल खासगी कंपनीच्या केंद्राकडे वाढला आहे.

आगामी काळात दरवाढीची अपेक्षा कमी...बाहेर देशातून खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात होत असल्यामुळे स्थानिक बाजारातील सोयाबीनच्या खाद्यतेलास तसेच सोयाबीनच्या पेंडीला मागणी कमी झालेली आहे. याचा एकत्रित परिणाम होऊन कारखानदाराकडून सोयाबीनची मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर घसरत आहेत. पुढील काळात निवडणुका असल्यामुळे दरवाढीची शक्यता फारच कमी असल्याचे व्यापारी अमोल राठी यांनी सांगितले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र