शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

बोअरच्या पाण्यावर वाढवलेले सोयाबीन पावसाने नासवले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 4:17 PM

कोरड्या आणि ओल्या दुष्काळाचा फटका

ठळक मुद्दे ४४ हजार हेक्टर सोयाबीन पाण्यात 

- संदीप अंकलकोटे 

चाकूर (जि. लातूर) : दिवाळीपूर्वी कोरडा अन् दिवाळीनंतर ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला असून, तालुक्यातील ४४ हजार ४८० हेक्टर सोयाबीन पाण्यात गेले आहे. मोहनाळच्या एका शेतकऱ्याने १८ एकर सोयाबीन बोअरच्या पाण्यावर वाढविले. मात्र, परतीच्या पावसाने या सोयाबीनची नासाडी झाली असून, पीक पूर्ण कुजले आहे. 

चाकूर तालुक्यात ६८ हजार ७५ हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी ४४ हजार ४८० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. ९ हजार १२४ हेक्टरवर तूर आणि १ हजार १३५ हेक्टरवर अन्य पिके होती. पेरणीनंतर अधूनमधून झालेल्या पावसावर सोयाबीनचे पीक बऱ्यापैकी आले होते. मात्र ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने जोर धरला अन् होत्याचे नव्हते झाले. आता सारा शिवार पाण्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीवर पाणी फिरले आहे.

मोहनाळ येथील शेतकरी शिवकुमार चांदसुरे यांनी २४ एकरपैकी १८ एकर जमिनीवर सोयाबीन पेरले. बोअरचे पाणी देऊन सोयाबीन वाढविले. पीक बहरले होते. काढणीलाही आले होते. ५४ हजार रुपये देऊन काढणीचे गुत्ते दिले होते. पण अचानक आलेल्या पावसाने १८ एकरचा सोयाबीनचा फड पाण्यात नासला आहे. दरम्यान, चाकूर महसूल मंडळात ५ हजार ६८१, वडवळ नागनाथ १० हजार ६८, नळेगाव ७ हजार ९३६, शेळगाव ६ हजार ४५०, झरी (बु.) ६ हजार ७९९, तर आष्टा महसूल मंडळात ७ हजार ५३९ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. हे सर्व पीक पाण्यात आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेतीlaturलातूर