शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
4
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
5
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
6
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
7
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
8
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
11
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
12
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
13
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
14
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
15
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
16
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
17
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
18
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
19
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
20
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोअरच्या पाण्यावर वाढवलेले सोयाबीन पावसाने नासवले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:17 IST

कोरड्या आणि ओल्या दुष्काळाचा फटका

ठळक मुद्दे ४४ हजार हेक्टर सोयाबीन पाण्यात 

- संदीप अंकलकोटे 

चाकूर (जि. लातूर) : दिवाळीपूर्वी कोरडा अन् दिवाळीनंतर ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला असून, तालुक्यातील ४४ हजार ४८० हेक्टर सोयाबीन पाण्यात गेले आहे. मोहनाळच्या एका शेतकऱ्याने १८ एकर सोयाबीन बोअरच्या पाण्यावर वाढविले. मात्र, परतीच्या पावसाने या सोयाबीनची नासाडी झाली असून, पीक पूर्ण कुजले आहे. 

चाकूर तालुक्यात ६८ हजार ७५ हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी ४४ हजार ४८० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. ९ हजार १२४ हेक्टरवर तूर आणि १ हजार १३५ हेक्टरवर अन्य पिके होती. पेरणीनंतर अधूनमधून झालेल्या पावसावर सोयाबीनचे पीक बऱ्यापैकी आले होते. मात्र ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने जोर धरला अन् होत्याचे नव्हते झाले. आता सारा शिवार पाण्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीवर पाणी फिरले आहे.

मोहनाळ येथील शेतकरी शिवकुमार चांदसुरे यांनी २४ एकरपैकी १८ एकर जमिनीवर सोयाबीन पेरले. बोअरचे पाणी देऊन सोयाबीन वाढविले. पीक बहरले होते. काढणीलाही आले होते. ५४ हजार रुपये देऊन काढणीचे गुत्ते दिले होते. पण अचानक आलेल्या पावसाने १८ एकरचा सोयाबीनचा फड पाण्यात नासला आहे. दरम्यान, चाकूर महसूल मंडळात ५ हजार ६८१, वडवळ नागनाथ १० हजार ६८, नळेगाव ७ हजार ९३६, शेळगाव ६ हजार ४५०, झरी (बु.) ६ हजार ७९९, तर आष्टा महसूल मंडळात ७ हजार ५३९ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. हे सर्व पीक पाण्यात आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेतीlaturलातूर