शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लातुरात सोयाबीनचा दर पोहोचला ३१५० रुपयांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 11:40 IST

बाजारगप्पा : लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली. 

- हरी मोकाशे (लातूर)

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दसरा सण आनंदात साजरा करण्यासाठी शेतकरी नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या राशी करण्यात मग्न आहेत़ त्यामुळे लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली. 

सध्या २० हजार ४९४ क्विं़ दररोज आवक होत असून, सर्वसाधारण दर ३ हजार १५० रुपयांवर पोहोचला आहे़ हा दर हमीभावापेक्षा कमी असला तरी शासनाचे खरेदी केंद्र कधी सुरू होणार आणि हातात कधी पैसे मिळणार? यापेक्षा क्विं़मागे २५० रुपयांचा तोटा झाला तरी आनंदाच्या सणावर विरजण नको, अशा मानसिकतेतून सोयाबीनची विक्री करीत आहेत़

लातूर जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक सोयाबीन होय़ यंदा ऐन शेंगा भरण्याचा कालावधीत पावसाचा ताण आणि त्यानंतर दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनचा उतारा निम्म्याने घटला आहे़ त्यातच काढणीसाठी मजुरांचा खर्च वाढला आहे़ दसरा, दीपावलीपूर्वी शेतीमालाचे पैसे हाती पडावे, म्हणून शेतकरी धडपड करीत आहे़ त्यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोयाबीनची आवक दुप्पट झाला. कमाल दर ३,२३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़

पंधरा दिवसांपूर्वी बाजारपेठेत मूग आणि उडदाची आवक वाढली होती़; परंतु या आठवड्यात मुगाची आवक एक हजार क्विं़ने घटून दीड हजार क्विं़पर्यंत होत आहे़ आवक कमी झाली की दरात वाढ होते, या बाजारपेठेतील नियमाप्रमाणे दरात जवळपास २०० रुपयांनी वाढ होऊन तो ५ हजार ४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़ तसेच उडदाची आवक निम्म्याने घटली असून १ हजार ७०० क्विं़पर्यंत होत आहे़ सर्वसाधारण दर ४२५० रुपये असा स्थिर असला तरी कमाल दरात ५० रुपयांनी वाढ झाली.

दरम्यान, तुरीची साडेपाचशे क्विं़पर्यंतच आवक स्थिर असून, दरात ५० रुपयांची घट झाली असून ३ हजार ६०० रुपये प्रति क्विं़ भाव मिळत आहे़ सध्या बाजारपेठेत गव्हास सर्वसाधारण दर २०००, हायब्रीड ज्वारी- १२००, रबी ज्वारी- १९५०, पिवळी ज्वारी- २५००, हरभरा- ३९६०, करडई- ३५००, तीळ- १०५००, धन्यास ४००० रुपये प्रति क्विं़ दर मिळत आहे़ गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये उडीद, मुगाची खरेदी सुरू झाली होती़ त्यामुळे यंदाही आॅक्टोबरमध्ये प्रत्यक्षात खरेदीस सुरुवात होणे अपेक्षित होते; परंतु सध्या या शेतमालाची आॅनलाईन नोंदणीचे कामच सुुरू आहे़

आतापर्यंत जिल्ह्यातील ८ केंद्रांवर जवळपास चार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली.ऐन दीपावलीच्या तोंडावर खरेदी सुरू झाल्यास शेतमालाचे पैसे सण झाल्यानंतर मिळतील़ त्यापेक्षा मिळेल त्या दराने शेतमाल विक्री करीत आहेत़ गत गुरुवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतमाल तारण योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देऊन बाजार समित्यांत हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणारे व्यापारी, अडत्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले. वास्तविक, आतापर्यंत कुठल्याही शेतमालाला हमीभाव मिळाला नाही़ सध्याही दर घसरलेलेच आहेत़ त्यामुळे बाजार समित्या किती अडते, खरेदीदारांवर कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे़.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी