शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

लातुरात सोयाबीनचा दर पोहोचला ३१५० रुपयांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 11:40 IST

बाजारगप्पा : लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली. 

- हरी मोकाशे (लातूर)

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दसरा सण आनंदात साजरा करण्यासाठी शेतकरी नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या राशी करण्यात मग्न आहेत़ त्यामुळे लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली. 

सध्या २० हजार ४९४ क्विं़ दररोज आवक होत असून, सर्वसाधारण दर ३ हजार १५० रुपयांवर पोहोचला आहे़ हा दर हमीभावापेक्षा कमी असला तरी शासनाचे खरेदी केंद्र कधी सुरू होणार आणि हातात कधी पैसे मिळणार? यापेक्षा क्विं़मागे २५० रुपयांचा तोटा झाला तरी आनंदाच्या सणावर विरजण नको, अशा मानसिकतेतून सोयाबीनची विक्री करीत आहेत़

लातूर जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक सोयाबीन होय़ यंदा ऐन शेंगा भरण्याचा कालावधीत पावसाचा ताण आणि त्यानंतर दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनचा उतारा निम्म्याने घटला आहे़ त्यातच काढणीसाठी मजुरांचा खर्च वाढला आहे़ दसरा, दीपावलीपूर्वी शेतीमालाचे पैसे हाती पडावे, म्हणून शेतकरी धडपड करीत आहे़ त्यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोयाबीनची आवक दुप्पट झाला. कमाल दर ३,२३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़

पंधरा दिवसांपूर्वी बाजारपेठेत मूग आणि उडदाची आवक वाढली होती़; परंतु या आठवड्यात मुगाची आवक एक हजार क्विं़ने घटून दीड हजार क्विं़पर्यंत होत आहे़ आवक कमी झाली की दरात वाढ होते, या बाजारपेठेतील नियमाप्रमाणे दरात जवळपास २०० रुपयांनी वाढ होऊन तो ५ हजार ४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़ तसेच उडदाची आवक निम्म्याने घटली असून १ हजार ७०० क्विं़पर्यंत होत आहे़ सर्वसाधारण दर ४२५० रुपये असा स्थिर असला तरी कमाल दरात ५० रुपयांनी वाढ झाली.

दरम्यान, तुरीची साडेपाचशे क्विं़पर्यंतच आवक स्थिर असून, दरात ५० रुपयांची घट झाली असून ३ हजार ६०० रुपये प्रति क्विं़ भाव मिळत आहे़ सध्या बाजारपेठेत गव्हास सर्वसाधारण दर २०००, हायब्रीड ज्वारी- १२००, रबी ज्वारी- १९५०, पिवळी ज्वारी- २५००, हरभरा- ३९६०, करडई- ३५००, तीळ- १०५००, धन्यास ४००० रुपये प्रति क्विं़ दर मिळत आहे़ गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये उडीद, मुगाची खरेदी सुरू झाली होती़ त्यामुळे यंदाही आॅक्टोबरमध्ये प्रत्यक्षात खरेदीस सुरुवात होणे अपेक्षित होते; परंतु सध्या या शेतमालाची आॅनलाईन नोंदणीचे कामच सुुरू आहे़

आतापर्यंत जिल्ह्यातील ८ केंद्रांवर जवळपास चार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली.ऐन दीपावलीच्या तोंडावर खरेदी सुरू झाल्यास शेतमालाचे पैसे सण झाल्यानंतर मिळतील़ त्यापेक्षा मिळेल त्या दराने शेतमाल विक्री करीत आहेत़ गत गुरुवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतमाल तारण योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देऊन बाजार समित्यांत हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणारे व्यापारी, अडत्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले. वास्तविक, आतापर्यंत कुठल्याही शेतमालाला हमीभाव मिळाला नाही़ सध्याही दर घसरलेलेच आहेत़ त्यामुळे बाजार समित्या किती अडते, खरेदीदारांवर कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे़.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी