शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लातुरात सोयाबीनचा दर पोहोचला ३१५० रुपयांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 11:40 IST

बाजारगप्पा : लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली. 

- हरी मोकाशे (लातूर)

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दसरा सण आनंदात साजरा करण्यासाठी शेतकरी नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या राशी करण्यात मग्न आहेत़ त्यामुळे लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली. 

सध्या २० हजार ४९४ क्विं़ दररोज आवक होत असून, सर्वसाधारण दर ३ हजार १५० रुपयांवर पोहोचला आहे़ हा दर हमीभावापेक्षा कमी असला तरी शासनाचे खरेदी केंद्र कधी सुरू होणार आणि हातात कधी पैसे मिळणार? यापेक्षा क्विं़मागे २५० रुपयांचा तोटा झाला तरी आनंदाच्या सणावर विरजण नको, अशा मानसिकतेतून सोयाबीनची विक्री करीत आहेत़

लातूर जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक सोयाबीन होय़ यंदा ऐन शेंगा भरण्याचा कालावधीत पावसाचा ताण आणि त्यानंतर दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनचा उतारा निम्म्याने घटला आहे़ त्यातच काढणीसाठी मजुरांचा खर्च वाढला आहे़ दसरा, दीपावलीपूर्वी शेतीमालाचे पैसे हाती पडावे, म्हणून शेतकरी धडपड करीत आहे़ त्यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोयाबीनची आवक दुप्पट झाला. कमाल दर ३,२३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़

पंधरा दिवसांपूर्वी बाजारपेठेत मूग आणि उडदाची आवक वाढली होती़; परंतु या आठवड्यात मुगाची आवक एक हजार क्विं़ने घटून दीड हजार क्विं़पर्यंत होत आहे़ आवक कमी झाली की दरात वाढ होते, या बाजारपेठेतील नियमाप्रमाणे दरात जवळपास २०० रुपयांनी वाढ होऊन तो ५ हजार ४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़ तसेच उडदाची आवक निम्म्याने घटली असून १ हजार ७०० क्विं़पर्यंत होत आहे़ सर्वसाधारण दर ४२५० रुपये असा स्थिर असला तरी कमाल दरात ५० रुपयांनी वाढ झाली.

दरम्यान, तुरीची साडेपाचशे क्विं़पर्यंतच आवक स्थिर असून, दरात ५० रुपयांची घट झाली असून ३ हजार ६०० रुपये प्रति क्विं़ भाव मिळत आहे़ सध्या बाजारपेठेत गव्हास सर्वसाधारण दर २०००, हायब्रीड ज्वारी- १२००, रबी ज्वारी- १९५०, पिवळी ज्वारी- २५००, हरभरा- ३९६०, करडई- ३५००, तीळ- १०५००, धन्यास ४००० रुपये प्रति क्विं़ दर मिळत आहे़ गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये उडीद, मुगाची खरेदी सुरू झाली होती़ त्यामुळे यंदाही आॅक्टोबरमध्ये प्रत्यक्षात खरेदीस सुरुवात होणे अपेक्षित होते; परंतु सध्या या शेतमालाची आॅनलाईन नोंदणीचे कामच सुुरू आहे़

आतापर्यंत जिल्ह्यातील ८ केंद्रांवर जवळपास चार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली.ऐन दीपावलीच्या तोंडावर खरेदी सुरू झाल्यास शेतमालाचे पैसे सण झाल्यानंतर मिळतील़ त्यापेक्षा मिळेल त्या दराने शेतमाल विक्री करीत आहेत़ गत गुरुवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतमाल तारण योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देऊन बाजार समित्यांत हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणारे व्यापारी, अडत्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले. वास्तविक, आतापर्यंत कुठल्याही शेतमालाला हमीभाव मिळाला नाही़ सध्याही दर घसरलेलेच आहेत़ त्यामुळे बाजार समित्या किती अडते, खरेदीदारांवर कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे़.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी