शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
4
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
5
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
6
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
7
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
8
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
9
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
10
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
11
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
12
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
13
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
14
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
15
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
16
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
17
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
18
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
19
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
20
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरापासून पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

जळकोट : आठवडाभरापासून पाऊस नसल्याने जळकोट तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून उर्वरित ...

जळकोट : आठवडाभरापासून पाऊस नसल्याने जळकोट तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून उर्वरित ५० टक्के शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात आतापर्यंत १३९ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. बळिराजाचे डोळे वरुणराजाकडे लागले आहेत.

जळकोट तालुक्यात पेरणीयोग्य क्षेत्र २५ हजार हेक्टर आहे. नगदी पीक म्हणून सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असतो. त्यापाठोपाठ कापसाची लागवड केली जाते. तालुक्यात १० जून रोजी १५ मि.मी. पाऊस झाला होता. ११ जून रोजी ४० मि.मी. पाऊस झाला. १४ रोजी २९ मि.मी., तर १६ जून रोजी ४९ मि.मी. पाऊस झाला.

जळकोट महसूल मंडळात १९२ मि.मी., घोणसी मंडळात ९६ मि.मी. अशी पावसाची नोंद आहे. या पावसावर काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात केली. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने वेळेवर पेरण्या होत असल्याने समाधान व्यक्त होत होते. दरम्यान, १६ जूनपासून पावसाने डोळे वटारल्याने तालुक्यातील ५० टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तालुक्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा होतो. त्यापाठोपाठ कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तीळ ही पिके घेतली जातात. गेल्या आठवडाभरापासून पाऊस नसल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

उगवलेल्या पिकांना पाण्याची गरज...

मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसावर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. त्यांचे चांगले पीक उगवले आहे. सध्या पाण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, ते शेतकरी विहीर, बोअरच्या आधारे पाणी देत आहेत. मात्र, ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, असे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येत आहे.

१० हजार हेक्टरवर सोयाबीन...

तालुक्यात आतापर्यंत जवळपास १० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. त्यापाठोपाठ तूर, उडिदाचा अल्प प्रमाणात पेरा झाला आहे. गेल्या आठवड्यापासून पाऊस झाल्याने जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नाहीत. आगामी काळात पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी केले आहे.

दुबार पेरणीचे संकट...

तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाग मोलाचे बी- बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे. पेरणीवेळी खताचा वापर केला. परंतु, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. दुबार पेरणी करावी लागणार की काय अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.