शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

कुठे अवकाळी तर कुठे टंचाईच्या झळा तीव्र; लातुरात सात गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा!

By संदीप शिंदे | Updated: May 4, 2023 17:25 IST

गावांतील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लातूर : जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पावसाची हजेरी असली, तरी पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गावांतील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ६६ गाव-वाड्यांनी ६९ अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. यातील ७ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यास उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी टंचाई निवारणासाठी आराखडा तयार केला जातो. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जलस्रोतांच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली होती. मात्र, एप्रिलच्या मध्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पाणीपातळीत घट झाली आहे. परिणामी, गाव-वाड्यांवर टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील ५२ गावे व १४ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाल्याने संबंधित ग्रामपंचायतीने ६९ प्रस्ताव पंचायत समितीकडे अधिग्रहणासाठी दाखल केले आहेत. त्यातील ३९ गावांचे ४१ प्रस्ताव तहसीलस्तरावर असून, उपविभागीय अधिकारी यांनी ५ गावे व दोन वाड्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली असून, या सात गावांना आता अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना गावात पाणी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक टंचाईच्या झळा असून, २८ गाव-वाड्यांनी अधिग्रहणाचे प्रस्ताव सादर केले आहेत. यातील पाच गावांत स्वत: उपविभागीय अधिकारी यांनी पाहणी करून अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या तालुक्यांतील गावांत टंचाईच्या झळा...लातूर तालुक्यातील ५ गावे, औसा १४, निलंगा ८, अहमदपूर २८, चाकूर ५, उदगीर ३, तर जळकोट तालुक्यातील ६ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली आहे. रेणापूर, शिरूर अनंतपाळ आणि देवणी या तालुक्यांतून अद्याप एकही प्रस्ताव दाखल झालेला नसल्याचे टंचाई निवारण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

जून ते ऑगस्टसाठी विशेष आराखडा...भारतीय हवामान विभागाने ‘अल् निनो’च्या पार्श्वभूमीवर जून ते ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी सांगितले आहे. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र होऊ शकते. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जून ते ऑगस्ट महिन्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सव्वाचार कोटी रुपयांचा आराखडा या तीन महिन्यांसाठी तयार करण्यात आला असून, त्यास मंजुरीही देण्यात आली आहे.

मागील वर्षीप्रमाणे यंदाही टँकर नाही...जिल्ह्यात मागील वर्षीच्या उन्हाळ्यात केवळ अधिग्रहणाची मागणी होती. त्यामुळे टँकरची आवश्यकता भासली नाही. यंदाही आतापर्यंत केवळ अधिग्रहणाचे प्रस्ताव आले आहेत. त्यात अवकाळी पाऊस झाला असल्याने जलस्रोतांना काही प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी अधिग्रहण प्रस्तावांत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही टँकरचे प्रस्ताव येणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीdroughtदुष्काळ