शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कुठे अवकाळी तर कुठे टंचाईच्या झळा तीव्र; लातुरात सात गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा!

By संदीप शिंदे | Updated: May 4, 2023 17:25 IST

गावांतील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लातूर : जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पावसाची हजेरी असली, तरी पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गावांतील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ६६ गाव-वाड्यांनी ६९ अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. यातील ७ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यास उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी टंचाई निवारणासाठी आराखडा तयार केला जातो. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जलस्रोतांच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली होती. मात्र, एप्रिलच्या मध्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पाणीपातळीत घट झाली आहे. परिणामी, गाव-वाड्यांवर टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील ५२ गावे व १४ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाल्याने संबंधित ग्रामपंचायतीने ६९ प्रस्ताव पंचायत समितीकडे अधिग्रहणासाठी दाखल केले आहेत. त्यातील ३९ गावांचे ४१ प्रस्ताव तहसीलस्तरावर असून, उपविभागीय अधिकारी यांनी ५ गावे व दोन वाड्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली असून, या सात गावांना आता अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना गावात पाणी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक टंचाईच्या झळा असून, २८ गाव-वाड्यांनी अधिग्रहणाचे प्रस्ताव सादर केले आहेत. यातील पाच गावांत स्वत: उपविभागीय अधिकारी यांनी पाहणी करून अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या तालुक्यांतील गावांत टंचाईच्या झळा...लातूर तालुक्यातील ५ गावे, औसा १४, निलंगा ८, अहमदपूर २८, चाकूर ५, उदगीर ३, तर जळकोट तालुक्यातील ६ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली आहे. रेणापूर, शिरूर अनंतपाळ आणि देवणी या तालुक्यांतून अद्याप एकही प्रस्ताव दाखल झालेला नसल्याचे टंचाई निवारण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

जून ते ऑगस्टसाठी विशेष आराखडा...भारतीय हवामान विभागाने ‘अल् निनो’च्या पार्श्वभूमीवर जून ते ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी सांगितले आहे. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र होऊ शकते. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जून ते ऑगस्ट महिन्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सव्वाचार कोटी रुपयांचा आराखडा या तीन महिन्यांसाठी तयार करण्यात आला असून, त्यास मंजुरीही देण्यात आली आहे.

मागील वर्षीप्रमाणे यंदाही टँकर नाही...जिल्ह्यात मागील वर्षीच्या उन्हाळ्यात केवळ अधिग्रहणाची मागणी होती. त्यामुळे टँकरची आवश्यकता भासली नाही. यंदाही आतापर्यंत केवळ अधिग्रहणाचे प्रस्ताव आले आहेत. त्यात अवकाळी पाऊस झाला असल्याने जलस्रोतांना काही प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी अधिग्रहण प्रस्तावांत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही टँकरचे प्रस्ताव येणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीdroughtदुष्काळ