शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शंखी गोगलगायीने नुकसान; भरपाईपोटी लातूर जिल्ह्याला मिळाले ९३ कोटी

By हणमंत गायकवाड | Updated: September 14, 2022 17:52 IST

६८ हजार ३८५ हेक्टरचे नुकसान झाले असून १ लाख ५ हजार ६३६ लाभार्थी आहेत

लातूर : शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात ६८ हजार ३८५ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानीच्या भरपाईपोटी शासनाकडून ९३ कोटी रुपये मदत मंजूर झाली आहे. १ लाख ५ हजार ६३६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत लवकरच वर्ग होणार आहे. या मदतीचा अध्यादेश शासनाने बुधवारी काढले आहेत.

जुलै महिन्याच्या प्रारंभापासून लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांवर वेगवेगळे रोग पसरले गेले. यलो मॅझिकसह शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव पिकांवर झाला. जिल्ह्यातील ६८ हजार ३८५ हेक्टरवरील पिके शंखी गोगलगायीने फस्त केले होते. शासनाच्या आदेशानुसार पंचनामे केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली. १ लाख ५ हजार ६३६ शेतकऱ्यांच्या शेतातील खरीपाचे पिक शंखी गोगलगायीने फस्त केले.२ हेक्टरपुढील ९२ हजार ६५२ शेतकऱ्यांच्या ५९ हजार ७६४.३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्याला शासनाने नुकसान भरपाई म्हणून ४० कोटी ६३ लाख ९७ हजार रुपये मंजूर केले आहेत. तर २ ते ३ हेक्टरपर्यंत १२ हजार ९८४ शेतकऱ्यांच्या ८ हजार ६२०.७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाने ११ कोटी ७२ लाख ४२ हजार रुपये मंजूर केले आहेत.२ हेक्टरपर्यंत आणि ३ हेक्टरपर्यंत मिळून १ लाख ५ हजार ६३६ शेतकऱ्यांच्या ६८ हजार ३८५ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडून ९३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

प्रतिहेक्टर अशी मिळणार मदत...लातूर जिल्ह्यामध्ये जिरायत पिकाचे नुकसान झालेले आहे. बागायत किंवा बहूवार्षिक पिकाच्या नुकसानीचे क्षेत्र जिल्ह्यात निरंक आहे. त्यामुळे जिरायत (खरीप) पिकांसाठी प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपये शासनाकडून जाहीर झाले असून, त्याची मदतही मंजूर झाली आहे. ३ हेक्टर पर्यतच्या नुकसानीसाठी मदत मंजूर झाली आहे. या सुत्रानुसार जिल्ह्याला ९३ कोटी रुपये मंजूर झाले आहे, असे १४ सप्टेेंबर रोजी निघालेल्या अध्यादेशात म्हंटले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीlaturलातूर