शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अंडी टाकण्या अगोदरच गोगलगायीचे नियंत्रण आवश्यक; तरच सोयाबीन पिकाचे होईल संरक्षण

By हणमंत गायकवाड | Updated: July 4, 2023 16:00 IST

गोगलगायी सोयाबीन पिकाचे रोप अवस्थेत मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे नियंत्रण करणे आवश्यक आहे.

लातूर : मागील वर्षी सुप्त अवस्थेत गेलेल्या गोगलगायी चालू वर्षातील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जमिनीवर आलेल्या आहेत. गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. यंदा ते होऊ नये म्हणून सुप्त अवस्था संपून जमिनीवर आलेल्या गोगलगायींचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्यांनी अंडे टाकण्याच्या अगोदर नियंत्रण केले तर चालू हंगामातील सोयाबीन पिकाचे नुकसान टाळता येईल, असा सल्ला कृषी अभ्यासकांनी दिला आहे.

जमिनीतील सुप्त अवस्था संपून वर आलेल्या गोगलगायी पंधरा दिवसांत समान आकाराच्या गोगलगायींशी संग करून पंधरा दिवसांनंतर जमिनीच्या खाली प्रत्येक गोगलगाय १०० ते १५० अंडी टाकतात. या अंड्याद्वारे गोगलगायींचे पुढील वर्षाची पिढी तयार होते. त्यामुळे अंडी टाकण्याच्या अगोदर जर आपण गोगलगायींचे नियंत्रण केले तर चालू हंगामातील सोयाबीन पिकाबरोबरच पुढील वर्षातील सोयाबीन पिकाचे संरक्षण होण्यास मदत होईल.

गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन...गोगलगायी सोयाबीन पिकाचे रोप अवस्थेत मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे नियंत्रण करणे आवश्यक आहे. सध्या गोगलगायी सुप्त अवस्थेतून बाहेर आलेल्या आहेत. दररोज सकाळी सहा ते आठच्या दरम्यान बांधाच्या बाजूने आढळून येत आहेत. त्यामुळे गोगलगायीच्या प्रभावी नियंत्रणासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांनी मोहीम स्वरूपात सकाळी सहा ते आठच्या दरम्यान शेतात जाऊन जमिनीच्या वर आलेल्या गोगलगायी गोळा कराव्यात. गोळा केलेल्या गोगलगायी कुठे न टाकून देता साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावेत. गोळा केलेल्या गोगलगायीवर मीठ किंवा चुन्याची भुकटी टाकावी. त्यासोबतच सुतळीचे बारदाने गुळाच्या पाण्यात भिजवून आदल्या दिवशी बांधाच्या बाजूने रँडम पद्धतीने टाकावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी बारदान या खाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून मिठाच्या अथवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायींचा प्रादुर्भाव जास्त क्षेत्रावर झाला असल्यास गोळ्याचे पावडर तयार करून पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करावी. पेस्ट मुरमुऱ्याला लावावी. मुरमुरे गोगलगाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रावर टाकावेत. गोळा करताना हातात हातमोजे घालणे आवश्यक आवश्यक. या पद्धतीने गोगलगाय नियंत्रणासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर