शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

एकाच मोपेडवरून सहा जणांचा प्रवास आला अंगलट; आडे कुटुंबातील चौघांचा मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: March 4, 2023 22:00 IST

दाेघा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

लातूर : कळंबच्या दिशेने एकाच दुचाकीवरून चक्क सहा जण प्रवास करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, याच दुचाकीला कळंबकडून लातूरच्या दिशेने शिमला मिरचीची वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकअप टेम्पाेने जाेराने उडवले. या भीषण अपघातात दुचाकीवरील सहा जण रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जागीच ठार झाले असून, दाेघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास लातूर-कळंब महामार्गावरील जाेडजवळानजीक घडला.

पाेलिसांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील नाईकनगर, जवळगा तांडा येथील विलास प्रकाश आडे (वय ४०), आकश प्रकाश आडे (वय ३५), शंकर विकास आडे (वय ४), वैशाली विकास आडे (वय ६), शशिकला प्रकाश आडे (वय ५५) आणि जान्वी विकास आडे (वय १२) असे सहा जण एकाच दुचाकीवरून (एमएच २४ वाय ४३९९) लातूर येथून कळंबच्या दिशेने प्रवास करत हाेते. रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास दुचाकी जाेडजवळा गावानजीक आली. दरम्यान, कळंब येथून लातूरच्या दिशेने शिमला मिरची घेऊन निघालेल्या भरधाव टेम्पाेने (एमएच २५ एजे ५०५३) दुचाकीला उडवले. या भीषण अपघातात सहा जण दुचाकीवरून उडून रस्त्यावर फेकले गेले. दुचाकीवरील चार जण जागीच ठार तर दाेघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विलास प्रकाश आडे (वय ४०), आकश प्रकाश आडे (वय ३५), शंकर विकास आडे (वय ४), वैशाली विकास आडे (वय ६) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये शशिकला प्रकाश आडे आणि जान्वी विकास आडे हे गंभीर जखमी झाले. असे गातेगाव पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक घारगे यांनी सांगितले.

नाईकनगर तांड्यावर झाले अंत्यसंस्कार...

आडे कुटुंबीयातील चाैघांवर शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास काळाने घाला घातला. या भीषण अपघाताने एका क्षणात चार जणांचा बळी घेतला. रात्रीच्या काळाेखात झालेल्या अपघाताने नेमके काय झाले आहे, हेच काही वेळ समजले नाही. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी याची माहिती पाेलिसांना दिली. घटनास्थळी गावकरीही धावून आले. या घटनेने नाईकनगर तांड्यावर शाेककळा पसरली असून, मृतदेहावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

६ जणांचा प्रवास;व्हिडीओ व्हायरल..

.लातूर-कळंब महामार्गावरून एकाच दुचाकीवरून सहा जण प्रवास करत असल्याचे अन्य वाहनधारकांना कुतूहल वाटले आणि त्यांनी व्हिडीओ केला. हाच व्हिडीओ अपघातानंतर साेशल मीडियात व्हायरल झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघे माेठे आणि तीन लहान मुले प्रवास करताना व्हिडीओत दिसून येत आहे. हाच प्रवास त्यांच्या जिवावर बेतला आहे.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर