शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करा

By आशपाक पठाण | Updated: February 29, 2024 19:32 IST

सकल मराठा समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लातूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी मंत्री, आमदारांनी केली आहे. घटनेचा आदर ठेवत ती मागणी आम्हाला मान्य असून मराठा आंदोलनाला बदनाम करणाऱ्यांचीही एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लातूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गुरूवारी करण्यात आली आहे.

अजय महाराज बारसकर हे कुठेही कार्यरत नसताना अचानक मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना आंदोलनाची बदनामी करतात. तसेच संगिता वानखेडे या महिलेस अन्य काही लोक माध्यमांशी बोलताना आंदोनाला बदनाम करीत आहेत, त्यांचा बोलविता धनी कोण, त्यांना आर्थिक मदत कोठून मिळत आहे याचीही चौकशी करण्यात यावी. अंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज, गोळीबार करण्यास कोण भाग पाडले, बीड जिल्ह्यात राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या घरावर व व्यावसायिक आस्थापनांवर जिवघेणे हल्ले करून जाळपोळ कोणाच्या सांगण्यावरून केली गेली. 

मागील १५ दिवसांत मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही लोक वैयक्तिक व अत्यंत खालच्या पातळीवर माध्यमातून टीका करीत आहेत, यांच्या मागे कोण आहे, कोणाच्या सांगण्यावरून हे लोक अशी भाषा वापरीत आहेत, याचीही एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

कोणाच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल केले२४ फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्रात शांततेत रास्ता रोको आंदोलन सुरू असताना आंदोलनातील व्यक्तींवर जाणून बूजून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, कोणाच्या सांगण्यावरून असे केले जात आहे याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :laturलातूरMaratha Reservationमराठा आरक्षण