निलंगा तालुक्यातील खडकउमरगा या गावात पंचवीस घरावरून विद्युतताराचे कनेक्शन गेले आले. २००५ पासून ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात अनेक वेळा चकरा मारून सदरील विद्युततारा हटविण्याची मागणी केली आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. बुधवारी विश्वनाथ शिवाजी कदम या युवकांस विद्युततारांचा शॉक लागून जीव गमवावा लागला. त्याची पत्नी, आई, वडील, एक मुलगा व एक मुलगी यांचा आधार गेल्याचा राग मनात धरून निलंगा येथील महावितरण कार्यालयासमोर गुरुवारी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. मात्र, येथील कार्यकारी अभियंता व्ही.आर. ढाकणे यांनी मयत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी महावितरण कंपनीकडे प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करणार व मदत मिळवून देणार तसेच दोन दिवसात विद्युततारांचे स्थलांतर काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात नरसिंग भुरे, देवानंद चव्हाण, दिगंबर बोयणे, मंगेश कदम, विष्णू कदम, शंकर भुरे, संदीप चव्हाण, परशुराम कदम, केशव कदम, विठ्ठल कदम, सतीश चव्हाण, दुष्यंत कदम, उमेश कदम, गोविंद काळे, नागनाथ स्वामी, अनिकेत भुरे, अजय तेलंगे, शिवाजी भुरे, रामलिंग भुरे, तुकाराम कदम, दत्तात्रय मल्लीशे, किशोर काळे, किशोर कदम, पंडित पोद्दार, अजय कदम, बालाजी कदम, कांताबाई सूर्यवंशी, कस्तुरबाई काळे, मंगल बोयणे, कांताबाई चव्हाण, अनिता म्हेत्रे, सिंधू कदम, सोनाबाई भुरे, सुमित्राबाई पाटील, शशिकला म्हेत्रे, उज्वला काळे, वनिता काळे आदीसह ग्रामस्थांचा सहभाग होता.
फोेटो फाईल नेम : १००६ निलंगा आंदोलन
कॅप्शन : निलंगा तालुक्यातील खडक उमरगा येथील ग्रामस्थांनी निलंगा येथील महावितरण कार्यालयासमोर गुरुवारी ठिय्या आंदोलन केले.