शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची छाया गडद; १ हजार ९७ गावांना लागली धास्ती

By हरी मोकाशे | Updated: January 3, 2024 18:11 IST

लातूर जिल्हा परिषद : टंचाई निवारणार्थ ४० कोटींचा आराखडा तयार

लातूर : पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस न झाल्याने जिल्ह्यास हिवाळ्यातच पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. दरम्यान, आगामी सहा महिन्यात जिल्ह्यातील १ हजार ९७ गावे आणि ३२२ वाड्यांना पाणीटंचाई जाणवण्याची भीती व्यक्त होत असून जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ ३९ कोटी ४८ लाख ६३ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह इतर नद्या वाहिल्या नाहीत. तसेच ओढे- नाले खळाळले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. शिवाय, साठवण तलाव, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. दरवर्षी परतीचा पाऊस होतो. त्यामुळे यंदाही आशा होती. परंतु, परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली. आगामी काळात तीव्र पाणीटंचाईची समस्या उद्भवेल म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित केले आहेत.

जानेवारी ते मार्चअखेरसाठी २० कोटींचा आराखडा...

जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ९७ गावे आणि २५२ वाड्यांना पाणीटंचाई जाणवण्याची भीती आहे. टंचाई निवारणासाठी १९ काेटी ६३ लाख २० हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच १ एप्रिल ते ३० जून या कालावधीसाठी १९ कोटी ८५ लाख ४३ हजारांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात अद्याप एकाही ठिकाणी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु नाही.

मार्चपर्यंत १४६ गावांना टँकरची आवश्यकता...उपाययोजना - उपाययोजनेअंतर्गतची गावे

टँकरद्वारे पाणीपुरवठा - १४६अधिग्रहण - ५५८

विंधन विहीर घेणे - २८१नळ योजना दुरुस्ती - ४७

तात्पुरती पुरक नळ योजना - २८विहिरीतील गाळ काढणे - ३६

एकूण - १०९७एप्रिल ते जून दरम्यानच्या उपाययोजना...उपाययोजना - गावे

टँकरद्वारे पाणीपुरवठा - ३१८अधिग्रहण - ६०७

विंधन विहीर घेणे - ४६एकूण - ९७१

१२ गावांना टंचाईच्या झळा...

डिसेंबरपासून जिल्ह्यातील १२ गावे आणि ३ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यात लातूर तालुक्यातील ४, औसा- २, अहमदपूर- ३ गावे आणि ३ वाड्या, शिरुर अनंतपाळ व जळकोट तालुक्यातील प्रत्येकी एका गावास पाणीटंचाई जाणवत आहे. या गावांनी अधिग्रहणासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले होते. पंचायत समितीने तहसील कार्यालयास प्रस्ताव सादर केले आहेत. अद्यापही त्यास मंजूरी देण्यात आली नाही.

यंदा अधिक टंचाईची भीती...आगामी काळात पाणीटंचाई अधिक प्रमाणात जाणवण्याची भीती आहे. त्यामुळे जानेवारी ते जून या सहा महिन्यांत उपाययोजना राबविण्यासाठी ३९ कोटी ४८ लाख ६३ हजार रुपयांचा टंचाई निवारणार्थ आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाने जलसाठे पिण्यासाठी आरक्षित केले आहेत. नागरिकांची पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

 

टॅग्स :laturलातूरWaterपाणी