शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची छाया गडद; १ हजार ९७ गावांना लागली धास्ती

By हरी मोकाशे | Updated: January 3, 2024 18:11 IST

लातूर जिल्हा परिषद : टंचाई निवारणार्थ ४० कोटींचा आराखडा तयार

लातूर : पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस न झाल्याने जिल्ह्यास हिवाळ्यातच पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. दरम्यान, आगामी सहा महिन्यात जिल्ह्यातील १ हजार ९७ गावे आणि ३२२ वाड्यांना पाणीटंचाई जाणवण्याची भीती व्यक्त होत असून जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ ३९ कोटी ४८ लाख ६३ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह इतर नद्या वाहिल्या नाहीत. तसेच ओढे- नाले खळाळले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. शिवाय, साठवण तलाव, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. दरवर्षी परतीचा पाऊस होतो. त्यामुळे यंदाही आशा होती. परंतु, परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली. आगामी काळात तीव्र पाणीटंचाईची समस्या उद्भवेल म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित केले आहेत.

जानेवारी ते मार्चअखेरसाठी २० कोटींचा आराखडा...

जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ९७ गावे आणि २५२ वाड्यांना पाणीटंचाई जाणवण्याची भीती आहे. टंचाई निवारणासाठी १९ काेटी ६३ लाख २० हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच १ एप्रिल ते ३० जून या कालावधीसाठी १९ कोटी ८५ लाख ४३ हजारांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात अद्याप एकाही ठिकाणी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु नाही.

मार्चपर्यंत १४६ गावांना टँकरची आवश्यकता...उपाययोजना - उपाययोजनेअंतर्गतची गावे

टँकरद्वारे पाणीपुरवठा - १४६अधिग्रहण - ५५८

विंधन विहीर घेणे - २८१नळ योजना दुरुस्ती - ४७

तात्पुरती पुरक नळ योजना - २८विहिरीतील गाळ काढणे - ३६

एकूण - १०९७एप्रिल ते जून दरम्यानच्या उपाययोजना...उपाययोजना - गावे

टँकरद्वारे पाणीपुरवठा - ३१८अधिग्रहण - ६०७

विंधन विहीर घेणे - ४६एकूण - ९७१

१२ गावांना टंचाईच्या झळा...

डिसेंबरपासून जिल्ह्यातील १२ गावे आणि ३ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यात लातूर तालुक्यातील ४, औसा- २, अहमदपूर- ३ गावे आणि ३ वाड्या, शिरुर अनंतपाळ व जळकोट तालुक्यातील प्रत्येकी एका गावास पाणीटंचाई जाणवत आहे. या गावांनी अधिग्रहणासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले होते. पंचायत समितीने तहसील कार्यालयास प्रस्ताव सादर केले आहेत. अद्यापही त्यास मंजूरी देण्यात आली नाही.

यंदा अधिक टंचाईची भीती...आगामी काळात पाणीटंचाई अधिक प्रमाणात जाणवण्याची भीती आहे. त्यामुळे जानेवारी ते जून या सहा महिन्यांत उपाययोजना राबविण्यासाठी ३९ कोटी ४८ लाख ६३ हजार रुपयांचा टंचाई निवारणार्थ आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाने जलसाठे पिण्यासाठी आरक्षित केले आहेत. नागरिकांची पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

 

टॅग्स :laturलातूरWaterपाणी