शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
4
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
5
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
7
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
8
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
9
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
10
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
11
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
12
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
14
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
15
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
16
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
17
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
18
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
19
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
20
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल

मोठी बांधकामे व आस्थापनांना मलनिस्सारण प्रकल्प अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

विविध विकासकामांमुळे बांधकाम क्षेत्र वाढत असून, त्यात नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जात असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. कचरा व्यवस्थापन, ...

विविध विकासकामांमुळे बांधकाम क्षेत्र वाढत असून, त्यात नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जात असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. कचरा व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर व हरितगृह वायू उत्सर्जनात संतुलन साधण्यासाठी पर्यावरण पूरक इमारत बांधकाम क्षेत्रासाठी राज्य शासनाच्या वतीने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. या तत्त्वांच्या अंमलबजावणीमुळे ऊर्जा वापरात २० ते ३० टक्के तर पाणी वापरामध्ये १५ ते २० टक्के बचत होणे अपेक्षित आहे. यासोबतच कचऱ्याचे प्रमाणही कमी होणार आहे. राज्य शासन व हरित लवादाच्या आदेशानुसार यापुढे १० खाटांच्या वरील दवाखाने, १०० चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असणारी मंगल कार्यालये, २५ पेक्षा अधिक बेड असणारे हॉटेल व लॉजिंग, गोशाळा, शाळा व महाविद्यालये, ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी असणारे कोचिंग क्लासेस, तीनशेहून अधिक आसन क्षमता असणारे चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, अपार्टमेंट यांना आता मलनिस्सारण प्रकल्प बंधनकारक करण्यात आला आहे. नव्याने बांधकाम होत असेल किंवा यापूर्वी अशा संस्था किंवा आस्थापना कार्यरत असतील या दोघांसाठीही मलनिस्सारण प्रकल्प अनिवार्य आहे. अशा संस्थांनी लवकरात लवकर त्याचे बांधकाम करून घ्यायचे आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेऊन २५ ऑगस्टपर्यंत ते महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी दिले आहेत.