शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

वरिष्ठ महाविद्यालये गजबजली; पहिल्या दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:20 IST

लातूर : शहरासह जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालये प्रदीर्घ काळानंतर गजबजली. पहिल्या दिवशी सोमवारी जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ऑनलाइनला ...

लातूर : शहरासह जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालये प्रदीर्घ काळानंतर गजबजली. पहिल्या दिवशी सोमवारी जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ऑनलाइनला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिकवणीबरोबरच मित्रांना भेटण्याची उत्कंठा होती. त्यामुळे शहरातील काही महाविद्यालयांत ७५ टक्के उपस्थिती राहिली.

शहरातील सर्वच महाविद्यालय प्रशासनांनी विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देताना ऑक्सिमीटरने तपासणी केली. त्यानंतरच वर्गात प्रवेश देण्यात आला. ज्यांच्याकडे मास्क नाही, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत होता. शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद कला, वाणिज्य, विज्ञान, विधी महाविद्यालय तसेच महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयांसह अन्य महाविद्यालयांमध्ये वर्षभरानंतर विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये प्रवेश केला. गतवर्षी मार्च महिन्यापासून वर्ग बंद होते. या शैक्षणिक वर्षात लाॅकडाऊन असल्याने वर्ग बंद होते. सोमवारी ऑफलाइन वर्ग सुरू झाले. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शहरातील सर्वच महाविद्यालयांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे तंतोतंत पालन झाले. महाविद्यालय प्रशासनाने खबरदारी घेतली होती. ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करून मास्क असलेल्या विद्यार्थ्यांनाच वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला. बहुतांश महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवरच ही तपासणी करण्यात येत होती. वर्गामध्ये एका बेंचवर एक विद्यार्थी अशी आसनव्यवस्था होती.

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

बी.एस्सी. ते एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांची संख्या ११०० आहे. यातील ५० टक्के विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रवेश देताना तपासणी करण्यात आली. वर्षभरानंतर विद्यार्थी आल्याने आनंद वाटला. ज्यांना येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी ऑनलाइन अभ्यास वर्ग सुरू आहेत. -प्राचार्य डाॅ. जयप्रकाश दरगड

पेन देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने विद्यार्थ्यांना पेन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाने हा उपक्रम राबविला.

जिल्हाध्यक्ष प्रीतम दंडे, शहराध्यक्ष नागेश सातपुते, प्रवीण करमले, पवन कांबळे यांनी आपल्या मित्रांचे पेन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि वारंवार हात धुण्याबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने यावेळी जनजागृतीही केली.