शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

लातूरमधील १२८ गावांची जलयुक्त अभियानासाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 20:07 IST

जलयुक्त शिवार अभियानात बी.जे.एस म्हणजेच भारतीय जैन संघटना यावेळीही जलयुक्त शिवार अभियानात मदत करणार आहे.

संदीप शिंदे

लातूर : राज्य शासनाने पुनःश्च जलयुक्त अभियान ही योजना सुरु केली असून, त्यासाठी जिल्ह्यातील १२८ गावाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित गावात तात्काळ विशेष ग्रामसभा आणि शिवार फेरी करून २० एप्रिलपर्यंत या गावातील कामाचा आराखडा सादर करावा, असे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला उपजिल्हाधिकारी सुचित्रा सुगावे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस. कांबळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जेवरे, यांत्रिकी विभागाचे योगेश बिराजदार आणि भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील ज्या १२८ गावात जलयुक्त शिवार अभियान राबवायचे आहे, त्या गावात तात्काळ विशेष ग्राम सभा जिल्हा परिषदेकडून बोलविण्यात यावी तसेच गावची शिवार फेरी आयोजित करावी. जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार अभियानात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे गुरुवारी आणि शुक्रवारी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी बैठकीत दिल्या.

भारतीय जैन संघटना, प्रशासनाचा करार....

जलयुक्त शिवार अभियानात बी.जे.एस म्हणजेच भारतीय जैन संघटना यावेळीही जलयुक्त शिवार अभियानात मदत करणार आहे. त्यासाठी राज्य स्तरावर सामंजस्य करार करण्यात आले आहे. लातूर जिल्हाधिकारी आणि भारतीय जैन संघटना प्रतिनिधी यांच्यातही जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानासाठी करार करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील भुगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी आणि एकूणच जलसंवर्धानासाठी २२ मुद्दे सूचित केले असून त्या अनुषंगाने आता जिल्ह्यात काम होईल अशी माहितीही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

टॅग्स :laturलातूर