शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

ग्रामपंचायतीला मंदिर समजून सरपंचांनी कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST

औसा : सरपंचांमुळेच देशाचा विकास होऊ शकतो. चांगल्या ठरावाव्दारे आपण गावाचा विकास करु शकतो. आमदार, खासदारांना काम करणे सोपे ...

औसा : सरपंचांमुळेच देशाचा विकास होऊ शकतो. चांगल्या ठरावाव्दारे आपण गावाचा विकास करु शकतो. आमदार, खासदारांना काम करणे सोपे असते. परंतु, एखाद्या सरपंचासाठी गावकी सांभाळणे हे अवघड काम आहे. आपण आपल्या गावाच्या कल्याणासाठी ग्रामपंचायतीला पवित्र मंदिर समजून काम करण्याची वृत्ती सरपंचांनी आत्मसात करावी, असे प्रतिपादन आदर्श पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या सौजन्याने आयोजित औसा विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित सदस्यांची कार्यशाळा व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, ज्येष्ठ नेते सुशीलदादा बाजपाई, ॲड. मुक्तेश्वर वागदरे, ॲड. अरविंद कुलकर्णी, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, सचिव सुहास पाचपुते, प्रा. भीमाशंकर राचट्टे, काकासाहेब मोरे, सुनील उटगे, संतोष मुक्ता, ज्ञानेश्वर वाकडे, जिलानी बागवान, संजय कुलकर्णी, सरपंच संघटनेच्या अध्यक्षा सुकेशना जाधव, कल्पना डांंगे, दीपक चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

पेरे पाटील म्हणाले, आमदार अभिमन्यू पवार यांनी मनरेगा अंतर्गत शेतरस्ते, गोठे यासह विविध विकासकामांचा ग्रामपंचायत स्तरावर हाती घेतलेला महत्वाकांक्षी कार्यक्रम हा अत्यंत चांगला असून, शेतरस्ता कामात आपला निधी वळवत ग्रामीण भागातील विकास साध्य करण्याचा त्यांचा पॅटर्न आगामी काळात सर्वांनाच फायदेशीर ठरणारा आहे.

ग्रामीण उन्नतीसाठी शेतरस्ते आवश्यक...

आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, गावाच्या विकासासाठी आमदार, खासदारांची नव्हे तर विकास कृती आराखड्याची आवश्यकता आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतीला जोडधंद्याची गरज आहे. त्यामुळे सुरुवातीला मी कार्यशाळा घेऊन नगदी पीक म्हणून तुती लागवड करण्याचे आवाहन केले होते. मतदार संघातील ६०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. पण या संदर्भातील यंत्रणा कुचकामी असल्याने ही योजना कृषी विभागाला जोडावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होईल. माझ्या प्रयत्नांमुळे तुतीला शेती पिकाचा दर्जा मिळाला आहे. ग्रामीण आर्थिक उन्नतीसाठी शेतरस्ते आवश्यक असून, माझा तीन वर्षांचा आमदार निधी शेतरस्ते विकासासाठी प्रस्तावित केला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ८४० किलोमीटरचे शेतरस्त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी दिले आहेत.