शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

ग्रामपंचायतीला मंदिर समजून सरपंचांनी कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST

औसा : सरपंचांमुळेच देशाचा विकास होऊ शकतो. चांगल्या ठरावाव्दारे आपण गावाचा विकास करु शकतो. आमदार, खासदारांना काम करणे सोपे ...

औसा : सरपंचांमुळेच देशाचा विकास होऊ शकतो. चांगल्या ठरावाव्दारे आपण गावाचा विकास करु शकतो. आमदार, खासदारांना काम करणे सोपे असते. परंतु, एखाद्या सरपंचासाठी गावकी सांभाळणे हे अवघड काम आहे. आपण आपल्या गावाच्या कल्याणासाठी ग्रामपंचायतीला पवित्र मंदिर समजून काम करण्याची वृत्ती सरपंचांनी आत्मसात करावी, असे प्रतिपादन आदर्श पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या सौजन्याने आयोजित औसा विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित सदस्यांची कार्यशाळा व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, ज्येष्ठ नेते सुशीलदादा बाजपाई, ॲड. मुक्तेश्वर वागदरे, ॲड. अरविंद कुलकर्णी, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, सचिव सुहास पाचपुते, प्रा. भीमाशंकर राचट्टे, काकासाहेब मोरे, सुनील उटगे, संतोष मुक्ता, ज्ञानेश्वर वाकडे, जिलानी बागवान, संजय कुलकर्णी, सरपंच संघटनेच्या अध्यक्षा सुकेशना जाधव, कल्पना डांंगे, दीपक चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

पेरे पाटील म्हणाले, आमदार अभिमन्यू पवार यांनी मनरेगा अंतर्गत शेतरस्ते, गोठे यासह विविध विकासकामांचा ग्रामपंचायत स्तरावर हाती घेतलेला महत्वाकांक्षी कार्यक्रम हा अत्यंत चांगला असून, शेतरस्ता कामात आपला निधी वळवत ग्रामीण भागातील विकास साध्य करण्याचा त्यांचा पॅटर्न आगामी काळात सर्वांनाच फायदेशीर ठरणारा आहे.

ग्रामीण उन्नतीसाठी शेतरस्ते आवश्यक...

आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, गावाच्या विकासासाठी आमदार, खासदारांची नव्हे तर विकास कृती आराखड्याची आवश्यकता आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतीला जोडधंद्याची गरज आहे. त्यामुळे सुरुवातीला मी कार्यशाळा घेऊन नगदी पीक म्हणून तुती लागवड करण्याचे आवाहन केले होते. मतदार संघातील ६०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. पण या संदर्भातील यंत्रणा कुचकामी असल्याने ही योजना कृषी विभागाला जोडावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होईल. माझ्या प्रयत्नांमुळे तुतीला शेती पिकाचा दर्जा मिळाला आहे. ग्रामीण आर्थिक उन्नतीसाठी शेतरस्ते आवश्यक असून, माझा तीन वर्षांचा आमदार निधी शेतरस्ते विकासासाठी प्रस्तावित केला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ८४० किलोमीटरचे शेतरस्त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी दिले आहेत.