शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीला मंदिर समजून सरपंचांनी कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST

औसा : सरपंचांमुळेच देशाचा विकास होऊ शकतो. चांगल्या ठरावाव्दारे आपण गावाचा विकास करु शकतो. आमदार, खासदारांना काम करणे सोपे ...

औसा : सरपंचांमुळेच देशाचा विकास होऊ शकतो. चांगल्या ठरावाव्दारे आपण गावाचा विकास करु शकतो. आमदार, खासदारांना काम करणे सोपे असते. परंतु, एखाद्या सरपंचासाठी गावकी सांभाळणे हे अवघड काम आहे. आपण आपल्या गावाच्या कल्याणासाठी ग्रामपंचायतीला पवित्र मंदिर समजून काम करण्याची वृत्ती सरपंचांनी आत्मसात करावी, असे प्रतिपादन आदर्श पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या सौजन्याने आयोजित औसा विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित सदस्यांची कार्यशाळा व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, ज्येष्ठ नेते सुशीलदादा बाजपाई, ॲड. मुक्तेश्वर वागदरे, ॲड. अरविंद कुलकर्णी, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, सचिव सुहास पाचपुते, प्रा. भीमाशंकर राचट्टे, काकासाहेब मोरे, सुनील उटगे, संतोष मुक्ता, ज्ञानेश्वर वाकडे, जिलानी बागवान, संजय कुलकर्णी, सरपंच संघटनेच्या अध्यक्षा सुकेशना जाधव, कल्पना डांंगे, दीपक चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

पेरे पाटील म्हणाले, आमदार अभिमन्यू पवार यांनी मनरेगा अंतर्गत शेतरस्ते, गोठे यासह विविध विकासकामांचा ग्रामपंचायत स्तरावर हाती घेतलेला महत्वाकांक्षी कार्यक्रम हा अत्यंत चांगला असून, शेतरस्ता कामात आपला निधी वळवत ग्रामीण भागातील विकास साध्य करण्याचा त्यांचा पॅटर्न आगामी काळात सर्वांनाच फायदेशीर ठरणारा आहे.

ग्रामीण उन्नतीसाठी शेतरस्ते आवश्यक...

आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, गावाच्या विकासासाठी आमदार, खासदारांची नव्हे तर विकास कृती आराखड्याची आवश्यकता आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतीला जोडधंद्याची गरज आहे. त्यामुळे सुरुवातीला मी कार्यशाळा घेऊन नगदी पीक म्हणून तुती लागवड करण्याचे आवाहन केले होते. मतदार संघातील ६०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. पण या संदर्भातील यंत्रणा कुचकामी असल्याने ही योजना कृषी विभागाला जोडावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होईल. माझ्या प्रयत्नांमुळे तुतीला शेती पिकाचा दर्जा मिळाला आहे. ग्रामीण आर्थिक उन्नतीसाठी शेतरस्ते आवश्यक असून, माझा तीन वर्षांचा आमदार निधी शेतरस्ते विकासासाठी प्रस्तावित केला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ८४० किलोमीटरचे शेतरस्त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी दिले आहेत.