शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

संत कबीरांनी मानवाला विवेकवादी बनवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST

संत कबीर प्रतिष्ठान, लातूर व महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संत कबीर यांच्या ...

संत कबीर प्रतिष्ठान, लातूर व महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त श्री विद्यालय, लातूर येथे वृक्षारोपण व कबीरांची भाव भूमी व वैचारिक भूमी या विषयावर हैदराबाद येथील डॉ. रवी रंजन यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी संत कबीर प्रतिष्ठानचे संस्थापक-सचिव डॉ. रणजित जाधव होते. हिंदी साहित्य अकादमी, मुंबईचे सहसंचालक सचिन निंबाळकर, प्रतिष्ठानचे सचिव डॉ. दिलीप गुंजरगे, उपाध्यक्ष प्रा. राजेश विभुते, प्रा. तानाजी भोसले, विजय चव्हाण, विवेक सौताडेकर, डॉ. संतोष कुलकर्णी, प्राचार्य गणपत माने उपस्थित होते.

यावेळी डॉ. रंजन म्हणाले, मनुष्याची ओळख गुणात्मक कर्माने व मानवतेने व्हावी. आज मनुष्याची ओळख जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ग, वर्ण, रंगाच्या आधारावर होत असेल, तर कबीर म्हणतात, ही आधुनिकता असू शकत नाही. कबीरांनी संपूर्ण मानव मात्राला प्रेमाच्या धाग्यात बांधले. कबीरांचे किंवा संत कवीचे प्रेम नि:स्वार्थ, निष्कलंक, निष्कपट, निश्चल, पवित्र, सत्याचा अवलंब करणारे असावे, हाच खरा पुरुषार्थ होय. प्रेमानेच सकल सृष्टी सुखी, आनंदी हाईल.

अध्यक्षीय समारोपात डॉ. जाधव म्हणाले, भारतात जेवढे संत झाले, त्यात कबीर क्रांतिकारक कवी होऊन गेले. कबीर वैदिक परंपरेपेक्षा श्रमिक परंपरेचे पुरस्कर्ते होते. श्रमानेच ईश्वर प्राप्ती होते, असे विचार मांडले. प्रास्ताविक डॉ. दिलीप गुंजरगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेश विभुते, तर आभार डॉ. संतोष कुलकर्णी यांनी मानले.

कॅप्शन : संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त श्री विद्यालय, लातूर येथे कबीर प्रतिष्ठानच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. रणजित जाधव, सचिव प्रा दिलीप गुजरंगे, प्रा राजेश विभुते, प्रा तानाजी भोसले, श्री विवेक सौताडेकर, प्रा. विजय चव्हाण, प्राचार्य गणपत माने.