शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
2
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
3
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
4
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
5
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
6
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
7
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
8
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
9
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
10
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
11
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
12
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
13
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
14
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
15
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
16
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
17
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
18
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
19
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

संत कबीरांनी मानवाला विवेकवादी बनवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST

संत कबीर प्रतिष्ठान, लातूर व महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संत कबीर यांच्या ...

संत कबीर प्रतिष्ठान, लातूर व महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त श्री विद्यालय, लातूर येथे वृक्षारोपण व कबीरांची भाव भूमी व वैचारिक भूमी या विषयावर हैदराबाद येथील डॉ. रवी रंजन यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी संत कबीर प्रतिष्ठानचे संस्थापक-सचिव डॉ. रणजित जाधव होते. हिंदी साहित्य अकादमी, मुंबईचे सहसंचालक सचिन निंबाळकर, प्रतिष्ठानचे सचिव डॉ. दिलीप गुंजरगे, उपाध्यक्ष प्रा. राजेश विभुते, प्रा. तानाजी भोसले, विजय चव्हाण, विवेक सौताडेकर, डॉ. संतोष कुलकर्णी, प्राचार्य गणपत माने उपस्थित होते.

यावेळी डॉ. रंजन म्हणाले, मनुष्याची ओळख गुणात्मक कर्माने व मानवतेने व्हावी. आज मनुष्याची ओळख जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ग, वर्ण, रंगाच्या आधारावर होत असेल, तर कबीर म्हणतात, ही आधुनिकता असू शकत नाही. कबीरांनी संपूर्ण मानव मात्राला प्रेमाच्या धाग्यात बांधले. कबीरांचे किंवा संत कवीचे प्रेम नि:स्वार्थ, निष्कलंक, निष्कपट, निश्चल, पवित्र, सत्याचा अवलंब करणारे असावे, हाच खरा पुरुषार्थ होय. प्रेमानेच सकल सृष्टी सुखी, आनंदी हाईल.

अध्यक्षीय समारोपात डॉ. जाधव म्हणाले, भारतात जेवढे संत झाले, त्यात कबीर क्रांतिकारक कवी होऊन गेले. कबीर वैदिक परंपरेपेक्षा श्रमिक परंपरेचे पुरस्कर्ते होते. श्रमानेच ईश्वर प्राप्ती होते, असे विचार मांडले. प्रास्ताविक डॉ. दिलीप गुंजरगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेश विभुते, तर आभार डॉ. संतोष कुलकर्णी यांनी मानले.

कॅप्शन : संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त श्री विद्यालय, लातूर येथे कबीर प्रतिष्ठानच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. रणजित जाधव, सचिव प्रा दिलीप गुजरंगे, प्रा राजेश विभुते, प्रा तानाजी भोसले, श्री विवेक सौताडेकर, प्रा. विजय चव्हाण, प्राचार्य गणपत माने.