शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

‘सगेसोयरे अध्यादेश’ आचारसंहितेपूर्वी काढतील, तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही: मनोज जरांगे

By संदीप शिंदे | Updated: March 13, 2024 17:42 IST

आमच्या आया-बहिणींवर लाठीमार; त्यांची माफी कोण मागणार -मनोज जरांगे पाटील

अहमदपूर/ निलंगा/ औराद शहाजानी/ कासारशिरसी : मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून, आचारसंहिता लागण्यापूर्वी ‘सगेसोयरे अध्यादेश’ काढतील, अशी आशा आहे. सरकारने तसे नाही केले, तर आचारसंहितेनंतर सरकारच्या डावाला प्रतिडावाने उत्तर देऊ. एक इंचही मागे हटणार नाही, असे ठाम प्रतिपादन करीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणामुळे माझी चिडचिड होऊन चुकून शब्द गेले, त्याबद्दल माफी मागितली. मात्र, आंदोलनात आमच्या आया- बहिणींवर लाठीमार करून डोकी फोडली, त्यांची माफी कोण मागणार, असा सवालही संवाद बैठकांमध्ये उपस्थित केला.

अहमदपूर, निलंगा तालुक्यांतील माळेगाव कल्याणी, कासारशिरसी, निलंगा शहर आणि लातुरात बुधवारी संवाद बैठका झाल्या. अहमदपूरमध्ये जरांगे पाटील म्हणाले, सरकारने लवकरात लवकर ‘सगेसोयरे’संबंधी अध्यादेश काढावा. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता. मात्र, तो सरकारने पाळला नाही. सरकार मराठा समाजाला मागास मानत असेल, तर मागास प्रवर्गाबाहेरचे आरक्षण का दिले. समाज ३० टक्के आणि आरक्षण १० टक्के, हे कुठल्या धर्तीवर. माझ्यावर, सामान्य मराठाबांधवांवर एसआयटी नेमून आंदोलन दडपण्याचा डाव आहे. 

निलंगा येथील वृदांवन मंगल कार्यालयातील बैठकीत ते म्हणाले, कुणबी मराठा, सगेसोयरे व हैदराबाद गॅझेटला मान्यता देऊन ओबीसीतूनच आरक्षण द्यावे. २०१८ मध्ये १३ टक्के दिले आणि २०२४ मध्ये १० टक्के न टिकणारे आरक्षण दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुटी नाही. सरकार दडपशाही करून गुन्हे दाखल करीत आहे. त्याविरोधात सहा कोटी मराठे एकत्र येऊन दहशत मोडून काढतील, असेही मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणlaturलातूर