शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘सगेसोयरे अध्यादेश’ आचारसंहितेपूर्वी काढतील, तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही: मनोज जरांगे

By संदीप शिंदे | Updated: March 13, 2024 17:42 IST

आमच्या आया-बहिणींवर लाठीमार; त्यांची माफी कोण मागणार -मनोज जरांगे पाटील

अहमदपूर/ निलंगा/ औराद शहाजानी/ कासारशिरसी : मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून, आचारसंहिता लागण्यापूर्वी ‘सगेसोयरे अध्यादेश’ काढतील, अशी आशा आहे. सरकारने तसे नाही केले, तर आचारसंहितेनंतर सरकारच्या डावाला प्रतिडावाने उत्तर देऊ. एक इंचही मागे हटणार नाही, असे ठाम प्रतिपादन करीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणामुळे माझी चिडचिड होऊन चुकून शब्द गेले, त्याबद्दल माफी मागितली. मात्र, आंदोलनात आमच्या आया- बहिणींवर लाठीमार करून डोकी फोडली, त्यांची माफी कोण मागणार, असा सवालही संवाद बैठकांमध्ये उपस्थित केला.

अहमदपूर, निलंगा तालुक्यांतील माळेगाव कल्याणी, कासारशिरसी, निलंगा शहर आणि लातुरात बुधवारी संवाद बैठका झाल्या. अहमदपूरमध्ये जरांगे पाटील म्हणाले, सरकारने लवकरात लवकर ‘सगेसोयरे’संबंधी अध्यादेश काढावा. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता. मात्र, तो सरकारने पाळला नाही. सरकार मराठा समाजाला मागास मानत असेल, तर मागास प्रवर्गाबाहेरचे आरक्षण का दिले. समाज ३० टक्के आणि आरक्षण १० टक्के, हे कुठल्या धर्तीवर. माझ्यावर, सामान्य मराठाबांधवांवर एसआयटी नेमून आंदोलन दडपण्याचा डाव आहे. 

निलंगा येथील वृदांवन मंगल कार्यालयातील बैठकीत ते म्हणाले, कुणबी मराठा, सगेसोयरे व हैदराबाद गॅझेटला मान्यता देऊन ओबीसीतूनच आरक्षण द्यावे. २०१८ मध्ये १३ टक्के दिले आणि २०२४ मध्ये १० टक्के न टिकणारे आरक्षण दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुटी नाही. सरकार दडपशाही करून गुन्हे दाखल करीत आहे. त्याविरोधात सहा कोटी मराठे एकत्र येऊन दहशत मोडून काढतील, असेही मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणlaturलातूर