शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अफवा पसरविणे हा गुन्हाच, साेशल मीडियावर आक्षेपार्ह पाेस्ट केल्यास ३ वर्षांचा कारावास

By राजकुमार जोंधळे | Updated: April 25, 2023 18:41 IST

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक करावा, असे आवाहन पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले आहे.

लातूर : साेशल मीडियावर आक्षेपार्ह पाेस्ट व्हायरल करणे, लाइक करणे आणि ती फाॅरवर्ड करणे अंगलट येऊ शकते. असे करताना जनसामान्यांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. आक्षेपार्ह, चुकीच्या पाेस्ट व्हायरल केल्या तर तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आहे. त्यासाठी साेशल मीडिया वापरताना अधिक दक्ष राहण्याची गरज आहे, असे पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे म्हणाले.

साेशल मीडिया हा आजच्या जमान्यात नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक बनला आहे. साेशल मीडियाचा वापर सकारात्मक दृष्टीकाेन ठेवून केला पाहिजे. साेशल मीडियाचा वापर जितका चांगला ठरू शकताे, तितकाच ताे काेणाच्याही जिवावरही उठू शकताे. साेशल मीडियामुळे एखाद्याच्या भावना दुखावू शकतात. काेणाची माथी भडकू शकतात आणि त्यातून तेढ निर्माण हाेण्याचा धाेका असताे. घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, त्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्या काेणाच्या हक्क, अधिकारांवर गदा येत असेल तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठरत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक करावा, असे आवाहन पाेलिस अधीक्षक मुंडे यांनी केले आहे.

आयटी ॲक्टनुसार कारवाईची तरतूद...साेशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्यास आयटी ॲक्टनुसार कलम ६७ नुसार कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे भावना दुखावणारी भाषा असलेले मजकूर, फाेटाे, व्हिडीओ साेशल मीडियावर पाेस्ट करू नका. धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न करणारा, दुसऱ्याचा आत्मसन्मान दुखावणारा, देशाची एकता-सार्वभाैमत्व आदींचे नुकसान करणारा, काेणत्याही संप्रदायाच्या विराेधातला मजकूर साेशल मीडियावर व्हायरल करू नका.

अफवा पसरविणे हा ठरताे गुन्हाच...काेणाला जिवे मारण्याची धमकी देऊ नका, अश्लील कंटेंट, चाईल्ड पाेर्नाेग्राफी शेअर करू नका. अफवा पसरविणे हा गुन्हा आहे. तसे केल्यास कारवाई केली जाते. यातील काही गुन्ह्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षाही आहे. भारतीय आयटी ॲक्टनुसार सायबर क्राइमसाठी तीन वर्षांपासून आजीवन कारावासापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. एक लाख ते दहा लाख रुपयांपर्यंतच्या दंडाचीही शिक्षा न्यायालयाकडून ठाेठावली जाऊ शकते.

दाेषी ठरल्यास कारावासाची शिक्षा...नियमबाह्य मजकूर साेशल मीडियावर पाेस्ट केल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार दाेषी ठरविले जाते. यामध्ये साेशल मीडिया युझर्स, साेशल मीडिया कंटेंट प्राेव्हायडर, नेटवर्क सर्व्हिस प्राेव्हायडर्स आदींचाही समावेश असताे. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमlaturलातूर