शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

आरटीओचा दणका! ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ८४१ वाहनधारकांना २ कोटी ३७ लाखांचा दंड

By आशपाक पठाण | Updated: May 28, 2024 19:30 IST

एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत लातूरच्या परिवहन विभागाने राबविलेल्या वाहन तपासणीत २ हजार ८८० अवजड वाहनांची तपासणी करण्यात आली.

लातूर : मालवाहतूक वाहनांची बांधणी करीत असताना प्रत्येक वाहनांची क्षमता निश्चित केली जाते. त्यानुसार वाहनांची परिवहन विभागाकडे नाेंदणीही केली जाते. मात्र, प्रत्यक्षात वाहतूक करीत असताना २० टक्के ओव्हरलोड वाहतूक करीत असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षभरात प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने तपासणी केलेल्या २ हजार ८८० वाहनांत ८४१ वाहने ओव्हरलोड आढळली असून, त्यांच्याकडून २ कोटी ३७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणे मोटार वाहन कायद्याने गुन्हा आहे. तपासणीत ओव्हरलोड आढळून आल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाची पथके कारवाई मोहीम राबवितात. लातूर जिल्ह्यातून रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या मार्गावर पथकाची नजर असते. शिवाय, लातूरला मोठी बाजारपेठ असल्याने विविध प्रकारची मालवाहतूक केली जाते. त्यात कृषी मालाचाही समावेश आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत लातूरच्या परिवहन विभागाने राबविलेल्या वाहन तपासणीत २ हजार ८८० अवजड वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात किरकोळ वाढ आढळून आलेल्या वाहनांना समज देऊन सोडण्यात आले. पण, ५०० किलोपेक्षा अधिक ओव्हरलोड असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ओव्हरलोड वाहन थेट काट्यावर...प्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहन तपासणीत ओव्हरलोड वाहतुकीचा संशय आल्यास संबंधित वाहन थेट काट्यावर नेले जाते. एकदा का काटा झाला अन् त्यात ओव्हरलोड माल आढळून आला की लागलीच ऑनलाईन दंड मारला जातो. यासाठी परिवहन विभागाचे स्वतंत्र पथक रस्त्यावर असते. बार्शी रोड, रिंग रोड, औसा रोड, अंबाजोगाई रोड, नांदेड, तुळजापूर मार्गावर पथकाचे विशेष लक्ष असते. या पथकाकडून ट्रक, टेम्पोसह ग्रामीण भागातून येणारी छोटी वाहनेही तपासली जातात.

हेल्मेट, सीटबेल्टचाही दंड...प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने वर्षभरात २ हजार ८६० दुचाकी चालकांना हेल्मेटचा वापर न केल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ९ लाख ५७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच २ हजार २१७ चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली असता त्यात ७३९ जणांनी सीटबेल्ट लावला नसल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून ७ लाख ३६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक नको...वाहनधारकांनी क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करू नये. परिवहन विभागाच्या तपासणीत ओव्हरलोड वाहतूक आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. मागील वर्षभरात २ कोटी ३७ लाख ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ओव्हरलोड मालवाहतूक केल्यास वाहनांचे नुकसान होतेच शिवाय अपघाताचा धोका असतो, त्यामुळे वाहन मालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. - आशुतोष बारकुल, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरRto officeआरटीओ ऑफीस