शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

संधिवातीचा विळखा वाढतोय; महिलांमध्ये प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 7:14 PM

यावर नियंत्रणासाठी सकस आहार आणि व्यायाम आवश्यक असल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे़ 

ठळक मुद्देआहारात प्रोटिनची कमतरता भासत असल्याने जवळपास १५ ते २० टक्के लोकांना संधी वातीचा त्रास आहे़ संधिवातीचे अनेक प्रकार आहेत़ ती कोणत्याही वयात होऊ शकते़

- आशपाक पठाण  

लातूर : आहारात कार्बोहायड्रेटचे अधिक प्रमाण , खाली बसून जेवणाची पध्दत, व्यायामाचा अभाव आदी कारणामुळे संधिवातीचा त्रास लवकर सुरू होतो़ आहारात प्रोटिनची कमतरता भासत असल्याने जवळपास १५ ते २० टक्के लोकांना संधी वातीचा त्रास आहे़ यावर नियंत्रणासाठी सकस आहार आणि व्यायाम आवश्यक असल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे़ 

१२ आॅक्टोबर हा दिवस जागतिक संधिवात दिवस म्हणून साजरा केला जातो़ भारतात रक्तातील वातीचे प्रमाण १३ ते २० टक्के आहे तर वयोमानानुसार होणा-या वातीचे प्रमाण जवळपास ५० टक्के आहे़ हा आजार बरा होत नाही, अशा अनेक गैरसमजुती आहेत़ परंतु अद्ययावत उपचार पध्दती व नवनवीन औषधींचा शोध लागल्याने याला आळा घालता येणे शक्य आहे़

औषधी महागडी असली तरी रूग्णांना दिलासा मिळतो़ संधिवातीचे अनेक प्रकार आहेत़ ती कोणत्याही वयात होऊ शकते़ याचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक असून अनेक रूग्णांमध्ये संधिवातीचे ठोस कारणही सापडत नाही़ काहींना हा आजार अनुवंशिक किंवा जनुकीय बदलामुळे होत असल्याचे समोर आले आहे़ विशिष्ट जंतूसंसर्ग किंवा विषाणूमुळे संधिवात होते़ धुम्रपान, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव यातून आजाराला बळ मिळत आहे, असे संधिवात तज्ज्ञ डॉ़ सूरज धूत, डॉ़ अशोक पोदार यांनी सांगितले़  

योग्य वेळी उपचार आवश्यक़़नेहमी सांधे किंवा मांसपेशी दुखणे, सांधे आकडे, सूज येणे, शरीरावर वारंवार पुरळ येणे, वारंवार गर्भपात, थकवा जाणवणे, त्वचा जड पडणे, थंडीमुळे सांधे दुखणे, त्वचा कोरडी पडणे आदी लक्षणे ही संधिवातीची आहेत़ त्यामुळे रूग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घेणे आवश्यक आहे़ संधिवातीवर उपचार करण्यासाठी संशोधन करून औषधी निर्माण करण्यात येत आहे़ या औषधांमुळे रूग्णांना दिलासा मिळतो, असे डॉ़ सूरज धूत यांनी सांगितले़ 

थंडीपासून बचाव महत्वाचा़ वातीचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे़ उपचारात नवीन तंत्रज्ञान आले आहे़ औषधी महागडी असून यातून रूग्णांना लवकर दिलासा मिळतो़ वातावरणातील बदलाचा परिणाम संधिवातीच्या रूग्णांवर होतो़ हिवाळ्यात अशा रूग्णांना जास्त त्रास होतो़ त्यामुळे रूग्णांनी बचावासाठी उबदार कपडे परिधान करावेत़ नवीन तंत्रज्ञानामुळे रोगनिदान सोपे झाले आहे़ रूग्णांनी योग्य वेळी उपचार घेणे महत्वाचे आहे, असे डॉ़ अशोक पोदार यांनी सांगितले़

टॅग्स :laturलातूरmedicineऔषधंhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर