शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

मराठा क्रांती मोर्चाची ‘क्रांतीदिनी’ बंदची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 20:13 IST

 लातूर : मराठा क्रांती मोर्चाची लढाई आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे. ९ आॅगस्ट रोजी ‘क्रांती दिनी’ महाराष्ट्र बंद करण्याचे ठरले आहे. राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधून यावर शिक्कामोर्तब होईल, असा निर्णय रविवारी जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. मराठा क्रांती भवनात झालेल्या बैठकीला समाज बांधव मोठ्या ...

 लातूर : मराठा क्रांती मोर्चाची लढाई आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे. ९ आॅगस्ट रोजी ‘क्रांती दिनी’ महाराष्ट्र बंद करण्याचे ठरले आहे. राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधून यावर शिक्कामोर्तब होईल, असा निर्णय रविवारी जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. 

मराठा क्रांती भवनात झालेल्या बैठकीला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात आतापर्यंत ५८ मोर्चे काढले; परंतु, सरकारने जाहीर केलेल्या सवलतीतून काहीच पदरी पडले नाही. शासनाने केवळ दिशाभूल करून वेळ मारुन नेली आहे. त्यामुळे आता मूक मोर्चा न राहता ठोकपणे उत्तर देण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला. सरकारच्या भूमिकेचा संतप्त शब्दांत अनेक युवक कार्यकर्त्यांनी समाचार घेतला. शिवनीती (गनिमीकावा) या तंत्राने व जाहीरपणे आंदोलने करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. ९ आॅगस्ट २०१६ रोजी औरंगाबादेतून मराठा क्रांती मूक मोर्चास सुरुवात झाली होती. ‘भारत छोडो, करो या मरो’ या निश्चयाचा वस्तुपाठ असलेली आॅगस्ट्र क्रांतीही याच दिवशी सुरू झाली होती. त्यामुळे या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून महाराष्ट्र बंदसाठी हा दिवस निवडण्यात आला आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्ये, तालुक्यांतील नागरिकांना अवगत करून हे आंदोलन  ऐतिहासिक करण्याचे यावेळी ठरले.

लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाच्या प्रश्नांप्रती बाळगलेल्या मौनाबाबत तरुणांनी या बैठकीत संताप व्यक्त केला. स्वार्थासाठी सोयीपुरता वापर करणाºया स्वकियांनीच समाजाचे वाटोळे केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. त्यांना जागा दाखवा, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले. बैठकीला समाज बांंधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.