शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या हक्काचे आरक्षण परत मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST

लातूर : ओबीसी प्रवर्गाला दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे ओबीसी ...

लातूर : ओबीसी प्रवर्गाला दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. तो दूर करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने भाजपचे युवा नेते अरविंद पाटील- निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारने कोणतेही काम केले नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण बंद केले आहे. यावर महाराष्ट्र सरकारने केवळ न्यायालयात धाव घेतली. परंतु, सक्षम बाजू मांडली नाही. मागासवर्गीय आयोग स्थापन केला नाही, ओबीसी समाजाचा आवश्यक डाटा तयार केला नाही. या निष्काळजीपणामुळेच सर्वोच्च न्यायलयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्दबातल ठरवले आहे. राज्य सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाला राजकीय नेतृत्वाची संधी मिळणार नाही. यामुळे सरकारने भक्कम पुरावे तयार करुन या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा भाजप ओबीसी मोर्चाला आरक्षण मिळेपर्यंत रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर भाजपचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, युवा नेते अरविंद पाटील-निलंगेकर, प्रेरणा होनराव, ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष देवा गडदे, प्रशांत गाडेकर, व्यंकट वाघमारे, देवाभाऊ साळुंके, सुरेश राठोड, ॲड. शैलेश गोजमगुंडे, महादेव कानगुले, संजय गिरी, ललित तोष्णीवाल, सतीश ठाकूर, गणेश गोजमगुंडे, चंद्रकांत क्षीरसागर, विजय जगताप, बालाजी गाडेकर, अनिता रसाळ, अभिजीत मदने, वैजनाथ होळे, मुन्ना हाश्मी, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.