शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

ओबीसींच्या हक्काचे आरक्षण परत मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST

लातूर : ओबीसी प्रवर्गाला दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे ओबीसी ...

लातूर : ओबीसी प्रवर्गाला दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. तो दूर करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने भाजपचे युवा नेते अरविंद पाटील- निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारने कोणतेही काम केले नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण बंद केले आहे. यावर महाराष्ट्र सरकारने केवळ न्यायालयात धाव घेतली. परंतु, सक्षम बाजू मांडली नाही. मागासवर्गीय आयोग स्थापन केला नाही, ओबीसी समाजाचा आवश्यक डाटा तयार केला नाही. या निष्काळजीपणामुळेच सर्वोच्च न्यायलयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्दबातल ठरवले आहे. राज्य सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाला राजकीय नेतृत्वाची संधी मिळणार नाही. यामुळे सरकारने भक्कम पुरावे तयार करुन या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा भाजप ओबीसी मोर्चाला आरक्षण मिळेपर्यंत रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर भाजपचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, युवा नेते अरविंद पाटील-निलंगेकर, प्रेरणा होनराव, ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष देवा गडदे, प्रशांत गाडेकर, व्यंकट वाघमारे, देवाभाऊ साळुंके, सुरेश राठोड, ॲड. शैलेश गोजमगुंडे, महादेव कानगुले, संजय गिरी, ललित तोष्णीवाल, सतीश ठाकूर, गणेश गोजमगुंडे, चंद्रकांत क्षीरसागर, विजय जगताप, बालाजी गाडेकर, अनिता रसाळ, अभिजीत मदने, वैजनाथ होळे, मुन्ना हाश्मी, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.