शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

दुष्काळमुक्तीसाठी रेणापूर ते मुंबई मंत्रालय संघर्ष यात्रा, मुंबईत आंदोलन; नदीजोड प्रकल्प राबवण्याची मागणी

By आशपाक पठाण | Updated: September 17, 2023 21:29 IST

रेणापूर येथील श्रीराम विद्यालयाच्या समोरून यात्रेला सुरूवात झाली. यावेळी प्रभाबाई नागरगोजे यांच्या हस्ते करुणाताई मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.

लातूर - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा दुष्काळमुक्ती, नदीजोड प्रकल्प करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोळंगे आणि करुणाताई मुंडे यांच्या नेतृत्वात रेणापूर ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी संघर्ष यात्रेला रविवारी प्रारंभ झाला.

रेणापूर येथील श्रीराम विद्यालयाच्या समोरून यात्रेला सुरूवात झाली. यावेळी प्रभाबाई नागरगोजे यांच्या हस्ते करुणाताई मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. तर शेतकरी देडे यांच्या हस्ते गजानन बोलंगे यांचा सत्कार केला. यावेळी धीरज मुंडे, सोनाली गुळभिले यांची उपस्थिती होती. मुंबई येथे ही संघर्ष यात्रा पोहचल्यानंतर आझाद मैदानावर उपोषण करण्यात येणार असून त्यानंतर मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बाेळंगे यांनी सांगितले. या संघर्ष यात्रेत १२ शेतकऱ्यांचा सहभाग आहे. तर ३ वाहने आहेत. संघर्ष यात्रा १५ दिवसानंतर मुंबईत पोहचणार आहे. रेणापूर, पिंपळफाटा, अंबाजोगाई, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे मार्गे मुंबई दाखल होणार आहे. आंदोलनात अच्युत करमुडे, दत्तात्रय शिंगाडे, अमोल गोडभरले, इलाही शेख, राजकुमार नागरगोजे, संतराम चिकटे, राजकुमार तिडके, दशरथ निंगवारे, माधव चोपडे, प्रविण चिकटे, गोविंद आवळे, राजू नागरगोजे यांचा सक्रिय सहभाग आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनriverनदी