शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

दुष्काळमुक्तीसाठी रेणापूर ते मुंबई मंत्रालय संघर्ष यात्रा, मुंबईत आंदोलन; नदीजोड प्रकल्प राबवण्याची मागणी

By आशपाक पठाण | Updated: September 17, 2023 21:29 IST

रेणापूर येथील श्रीराम विद्यालयाच्या समोरून यात्रेला सुरूवात झाली. यावेळी प्रभाबाई नागरगोजे यांच्या हस्ते करुणाताई मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.

लातूर - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा दुष्काळमुक्ती, नदीजोड प्रकल्प करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोळंगे आणि करुणाताई मुंडे यांच्या नेतृत्वात रेणापूर ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी संघर्ष यात्रेला रविवारी प्रारंभ झाला.

रेणापूर येथील श्रीराम विद्यालयाच्या समोरून यात्रेला सुरूवात झाली. यावेळी प्रभाबाई नागरगोजे यांच्या हस्ते करुणाताई मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. तर शेतकरी देडे यांच्या हस्ते गजानन बोलंगे यांचा सत्कार केला. यावेळी धीरज मुंडे, सोनाली गुळभिले यांची उपस्थिती होती. मुंबई येथे ही संघर्ष यात्रा पोहचल्यानंतर आझाद मैदानावर उपोषण करण्यात येणार असून त्यानंतर मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बाेळंगे यांनी सांगितले. या संघर्ष यात्रेत १२ शेतकऱ्यांचा सहभाग आहे. तर ३ वाहने आहेत. संघर्ष यात्रा १५ दिवसानंतर मुंबईत पोहचणार आहे. रेणापूर, पिंपळफाटा, अंबाजोगाई, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे मार्गे मुंबई दाखल होणार आहे. आंदोलनात अच्युत करमुडे, दत्तात्रय शिंगाडे, अमोल गोडभरले, इलाही शेख, राजकुमार नागरगोजे, संतराम चिकटे, राजकुमार तिडके, दशरथ निंगवारे, माधव चोपडे, प्रविण चिकटे, गोविंद आवळे, राजू नागरगोजे यांचा सक्रिय सहभाग आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनriverनदी